मुंबई

High Court: मिठागरांच्या जमिनी खाजगी बिल्डरांना आंदण; उच्च न्यायालयात याचिका

Latest Maharashtra News: राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या आणि या जमिनींवर दुर्बल घटकांसाठी घरांच्या योजना राबवण्यास मुभा दिली.

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai News: मिठागरांच्या जमिनी अदाणीसारख्या खासगी बिल्डरांना आंदण देण्याच्या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला आहे. धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली अदाणी समूहाच्या कंपनीला मिठागरांच्या जमिनी दिल्या आहेत.

सरकारचा हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्या.देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुलुंड येथील अ‍ॅड. सागर देवरे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. मिठागरांच्या जमीन धारावी पुनर्वसन प्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तसेच परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांसाठी अदाणी समूहाच्या खासगी विकासकांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने मिठागरांच्या जमिनी राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या आणि या जमिनींवर दुर्बल घटकांसाठी घरांच्या योजना राबवण्यास मुभा दिली.

त्यानुसार केंद्राच्या ताब्यातील कांजूर येथील १२०.५ एकर, कांजूर व भांडुप येथील ७६.९ एकर आणि मुलुंड येथील ५८.५ एकर अशी एकूण २५५.९ एकर मिठागरांची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.

निव्वळ खासगी विकसकांच्या फायद्यासाठी सरकार मिठागरांच्या जमिनीवर अतिक्रमण करून पर्यावरणाचे नुकसान करत आहेत, असा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. या याचिकेवर लवकरच मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT