मुंबई

मोठी बातमी ः धारावीत भरणार देशातील सर्वात मोठे प्लाझ्मादान शिबिर, वाचा कधीपासून होणार सुरू

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना संसर्गामुळे चर्चेत आलेल्या धारावीत आता प्लाझ्मा दान संकल्प अभियानाची सुरुवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 27 जुलै या दिवशी या अभियानाला सुरुवात केली जाणार आहे. या अभियानामुळे पहिल्या दिवशी धारावीत देशातील पहिला प्लाझ्मा दान शिबिर घेतले जाईल.

आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरात कोरोनातून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करणार आहेत. जास्तीत जास्त प्लाझ्मा दान करण्यावर कशा पद्धतीने लक्ष देता येईल यावर विचार केला जात आहे. जवळपास 500 लोकांकडून प्लाझ्मा दान करुन घेण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. धारावीत शिबिरातून प्लाझ्मा काढण्याचे काम पालिकेच्या सायन, केईएम, नायर आणि कूपर रुग्णालयातील डॉक्टर करणार आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची पालिकेकडून तपासणी करुन जे रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या सक्षम ठरतील अश्यांकडून प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. 

धारावीत 27 तारखेला प्लाझ्मा दान शिबिर घेतले जाणार आहे. याबाबत विचार विनिमय सुरु आहे. पण, लवकरच याबाबतच्या सूचना आम्हाला दिल्या जातील. पालिकेकडून याबाबतची माहिती दिली जाईल. गेले दोन दिवस याबाबतची बैठक सुरु आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल आणि आम्हाला ही सूचना दिल्या जातील.

डॉ. अनिल पाचणेकर, भारतीय वैद्यकीय परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष 

प्लाझ्मा थेरपीने रुग्णाच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे समोर आले. पालिकेच्या काही रुग्णालयांत प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्यानंतर गंभीर रुग्णांवर या थेरपीचा वापर करण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे येण्याचे आवाहन पालिकेसह राज्य सरकारने केलं. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन प्लाझ्मा उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

रक्तदान, प्लाझ्मा दान शिबिरे आयोजित करा - मुख्यमंत्र्यांचे आवाहन

'आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत', असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. गेल्या चार महिन्यांपासून राज्य सरकार नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान ,प्लाझ्मा दान करावे असे आवाहन केले आहे.

------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

#MyModiStory कशी झाली होती फडणवीस आणि मोदींची पहिली भेट? कार्यक्रम आयोजक ते मुख्यमंत्री...

ITR Filing Deadline: उद्यापासून 5,000 दंड; ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस, 5 मिनिटांत स्वतः करा फाईल

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

Ashok Saraf : "वक्ख्या विक्खी वुख्खू" फेम अशोक मामांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार जाहीर, लवकरच कोल्हापुरात सोहळा

SCROLL FOR NEXT