मुंबई

लॉकडाऊनमुळे आर्थिक गर्तेत अडकलेल्या महिला वकिलांचे थेट अमित शहांना पत्र; वाचा काय केली मागणी

सुनिता महामुनकर


मुंबई : मागील चार महिन्यांपासून रोजगार हिरावलेल्या वकिल वर्गाला केंद्र सरकारने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आता देशभरातील तब्बल दोन हजार महिला वकिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रसह दिल्ली, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, बिहार, आसाम, इ. राज्यातील महिला वकिलांनी पत्र पाठविले आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वकिल वर्गाला हलाखीच्या परिस्थितीमध्ये रहावे लागत आहे आणि वकिलांच्या सन्मानाने जगण्याच्या आणि काम करण्याच्या मुलभुत अधिकारांवर आक्रमण होत आहे, मात्र अद्यापही केंद्र सरकारने याची दखल घेऊन पुनर्वसन योजना जाहीर केली नाही. हे खेदजनक आहे, असे या पत्रामध्ये म्हटले आहे. 

आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या वकिलांसाठी पाच लाख रुपयांचे कर्ज देणारी सामायिक योजना राबवावी, असे पत्रात सुचविले आहे. या रकमेचा परतावा 36 आठवड्यात करण्याची मुदत द्यावी आणि कर्जाचा मोरेटोरियम ( आपत्कालीन परिस्थितीत वसूल न करण्याचा अवधी) कालावधी एक वर्ष मंजूर करावा, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्रसह, केरळ, कर्नाटक, दिल्ली, गोवा अशा वेगवेगळ्या राज्यातील महिला वकिलांनी पत्राद्वारे  मदतीची मागणी केली आहे. 

बार कॉन्सिलसह अनेक वकिल संघटना आणि संस्थांंच्यावतीने केंद्र सरकारला याबाबत विनवणी करण्यात आली आहे. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही, असेही सांगण्यात आले आहे. वकिलांना आर्थिक समस्येतून बाहेर काढण्याबाबत बार कॉन्सिललाही पुरेसे यश मिळत नाही आहे. त्यामुळे आर्थिक निधीची चणचण वकिलांना भेडसावत आहे, असे महिला वकिलांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने व्यक्तिगत कर्ज मंजूर करावे आणि व्यावसायिक हमी बार कौन्सिलकडून घ्यावी आणि राष्ट्रीय पत हमी विश्वस्त कंपनीच्या लाभार्थीमध्ये वकील गटाचा समावेश करावा, अशी मागणी केली आहे. कंपनीकडून कौशल्य विकास, शिक्षण आदीसाठी कर्जपुरवठा केला जातो. तसेच केन्द्राच्या वीमा योजनेतही वकिलांना सामावून घ्यावे, असेही म्हटले आहे.

-------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT