डोंबिवली - मोदी सरकार आता वन नेशन वन इलेक्शन आणण्याच्या तयारीत आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले, सर्व निवडणूका एकत्र होत आहे हे चांगलेच. परंतु त्या प्रामाणिकपणे व्हायला हव्यात असे सुचक विधान केले आहे.
आमदार पाटील म्हणाले, आपल्याकडे सतत निवडणुका असतात. निवडणुकां शिवाय दुसरा उद्योग काय आहे. एका अर्थाने हे चांगले पण आहे. सर्व निवडणुका एकत्र झाल्या चांगल आहे. परंतु त्या प्रामाणिकपणे व्हायला हव्यात.
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनावर आपली प्रतिक्रिया देताना आमदार पाटील म्हणाले, अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे. मराठा आंदोलन इतके वेळा झाले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ती चालू होती. अचानक काय घडलं की पोलिसांना तेथे लाठीचार्ज करावा लागला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा समाजाचे आहेत. त्यांनी स्वतः या प्रश्नात जातीने लक्ष देऊन हा प्रश्न कसा तडीस नेता येईल मराठा आरक्षणाचा विषय कसा मार्गी लावता येईल यात लक्ष द्यायला पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.