long-term flood mitigation measures New water filling stations mumbai rain season sakal
मुंबई

Mumbai : पूर निर्मूलनाच्या दीर्घकालिन उपाययोजनेचा अभाव; मुंबईत पाणी भरण्याची नवी ठिकाणे

मुंबईत पाणी भरण्याची नवी ठिकाणे तयार होताहेत

विष्णू सोनवणे

मुंबई : मुंबईच्या भौगोलिक स्थितीनुसार अतिवृष्टीच्या काळात समुद्राला मोठी भरती असल्यास सखल भाग जलमय होतो. 50 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाचा निचरा करण्याची क्षमता पर्जन्य वाहिन्यांमध्ये नाही. 1993 पासून ब्रिमस्टोवॅड प्रकल्प ढेपाळला आहे. पूरावर तात्पुरती मलमट्टी केली मात्र दिर्घकालिन उपायोजना नसल्याने मुंबईत पावसाळ्यात पाणी भरण्याची नवी ठिकाणे तयार होत असल्याचे चिंता व्यक्त होत आहे.

भविष्यातील पुरस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार मुंबईत 1993 पासून ब्रिमस्टोवॅड प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली. या प्रकल्पामुळे 50 मिलिमीटर इतक्या पाण्याचा निचरा होत आहे. अतिवृष्टी आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा निचरा होत नाही. पालिकेच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.

पुराची नवी ठिकाणे नव्या ठिकाणी पाणी भरू लागले मुंबईला दरवर्षी पावसाळ्यात पुराशी सामना करावा लागतो. किंग्ज सर्कल, हिंदमाता, माटुंगा, कुर्ला, सायन, माहिम ही पुराचे पाणी भरण्याची हमखास ठिकाणे. गेल्या वर्षी येथील काही ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर झाला. त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला.

मात्र मुंबईत नवी ठिकाणे तयार होत असल्याबद्दल पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिका-यांनाच चिंता वाटू लागली आहे. फोर्ट, उच्च न्यायालयाचा परिसर, मलबार हिल, मरिनड्राईव्ह, चंदनवाडी, पारशी कॉलनी, शीव पूर्व आदी ठिकाणी नव्याने पाणी भरू लागले आहे. दक्षिण मुंबईत पाणी भरत नव्हते त्या ठिकाणीही आता पाणी भरू लागले आहे.

ब्रिटिश काळात मुंबईची सात बेटे होती, त्या ठिकाणी ब्रिटिशांनी वसाहती विकसित केल्या, त्या विभागात अजूनही पर्जन्यवृष्टीच्या काळात पाणी भरत नाही. ब्रिटिशांनी काटेकोर नियोजन केले, पर्यावरणाचा विचार केला होता.

मात्र 1960 नंतर मुंबईचा विकास झपाट्याने होत गेला, त्या विकास प्रक्रियेत मुंबईतील पर्यावरणाचा आणि विकास नियोजनाचा कोणताही ताळमेळ नाही, असा निष्कर्ष 2005 मध्ये मिठी नदीच्या महापुरांनंतर प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात काढण्यात आल्याची माहिती मुंबईचे अभ्यासक सुशांत राजे यांनी दिली.

मुंबईत काही ठिकाणी पावसाचे पाणी भरते, त्या भरणा-या पाण्याचा निचरा करण्यासाठी पाण्याच्या साठवण टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र ही तात्पुरती उपायोजना असून कायमस्वरूपी उपायोजनेचा दुष्काळ असल्याचे दिसून येत आहे. पाणी भरण्याची नवी ठिकाणे तयार होवू लागल्याने काही माजी पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिका-यांनी चिंता व्यक्त केली आहे.

पंप ही धुळफेक

मुंबईत दरवर्षी सुमारे अडीचशे ते पावणे तीनशे पंप पुराच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी वापरले जातात. अनेक ठिकाणी पाण्याचा उपसा केलेले पाणी दुस-या टोकाकडून पुन्हा त्याच ठिकाणी शिरते. त्यामुळे पंप ही धुळफेक ठकते. कंत्राटदारांना पोसण्यासाठी पंपांचा उपयोग होत असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी दरवर्षी येत असतात. मात्र त्याची दखल घेतली जात नाही.

पुढील 20 वर्षांचे प्लानिंग हवे

पुढील वीस पंचवीस वर्षात मुंबईतील पूराबाबत दीर्षकालिन उपायोजना राबवाव्यात. नियोजन करावे, विभागवार नियोजन करावे, टप्प्या पट्ट्याने हे काम करावे, त्यासाठी पालिकेच्या तज्ज्ञ अधिका-यांची टीम तयार करावी, नियोजनबध्द आणि कालबध्द काम करावे त्याशिवाय ही समस्या सुटणार नाही.

- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, मुंबई महानगर पालिका

प्रशासनाचे मौन पुरासाठी सज्ज, प्रशासनाचा दावा ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या कामाच्या टक्केवारीबाबत पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे पुरेशी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पुराबाबत आमची यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT