मुंबई

शासनाच्या दुर्लक्षामुळे यंत्रमाग उद्योग धोक्‍यात 

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी: भिवंडीतील कामगारांना सर्वाधिक रोजगार उपलब्ध करणाऱ्या यंत्रमाग उद्योग व्यवसायाला सध्या मंदीचे ग्रहण लागल्याने कापड कारखाने बंद होऊ लागले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत मालाला उठाव नसून निर्यातीचे प्रमाण कमी आहे. नफ्यापेक्षा तोटा अधिक होत असून यामुळे कामगारांचा रोजगारही धोक्‍यात आला आहे. गेल्या वर्षापासून असलेल्या मंदीमुळे हजारो यंत्रमाग कारखाने बंद पडत असून व्यापारी वर्ग गुजरात-सुरतकडे व्यापार उद्योगासाठी भिवंडीतून निघून गेले आहेत. त्यामुळे कामगार वर्गसुद्धा बेरोजगार होत आहे. या संकटात सापडलेल्या या उद्योगाकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीच भिवंडी पद्मानगर पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने व्यापारी वर्गाने केली आहे. 

राज्यात कापड उद्योगाची नगरी म्हणून भिवंडी शहराची ओळख असून भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग कारखाने आहेत. कुशल कामगारांसह अकुशल कामगारांनाही या क्षेत्रात सहज नोकऱ्या मिळत असल्याने रोजगाराचा प्रश्‍न काही प्रमाणात निर्माण होत नाही. विशेषकरून पॉवरलूम कारखान्यात उत्तर प्रदेश, बिहारसह परराज्यातील कामगार अधिक काम करत असून सुमारे तीन लाखांच्या आसपास भिवंडीत यंत्रमाग कारखाने कार्यरत आहेत. त्यावर दोन लाखांहून अधिक कामगार काम करीत आहेत, कृषी उद्योगानंतर राज्यात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करणारा कापड उद्योग आहे. नोटबंदी, जीएसटी, यान दर (सूत) व निर्यात धोरण निश्‍चित न झाल्याने हा व्यवसाय मंदीत सापडला असल्याचे भिवंडी पद्मानगर पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम वंगा यांचे मत आहे. बिकट परिस्थितीमुळे मागील वर्षांत भिवंडीतील हजारो यंत्रमागधारकांनी उद्योग बंद केल्याचे वंगा म्हणाले. देशातील कापड उत्पादन पाहता निर्यातीमध्ये 40 टक्के वाढ होणे अपेक्षित होते. तसे झालेले नसून देशाबाहेर नवीन बाजाराचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत. 

वर्षापासून यंत्रमाग कारखानदार विविध समस्यांना तोंड देत आहेत. महागाई वाढल्याने कामगारवर्ग जास्त पगार मागू लागला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कपड्याला उठाव नाही. विक्री केलेल्या मालाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. नफा मिळत नसल्याने कारखानदार मशिनरी भंगारमध्ये विकून कारखाने बंद करू लागले आहेत. 
- पुरुषोत्तम वंगा, अध्यक्ष, भिवंडी पद्मानगर पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन. 
 
यंत्रमाग पॉवरलूम उद्योग संपेल 
दिवसेंदिवस या उद्योगाची परिस्थिती अवघड होत चालली असून याकडेही वस्त्रोद्योग मंत्रालयाने लक्ष देणे खूप गरजेचे आहे. अन्यथा यंत्रमाग पॉवरलूम उद्योग संपेल, अशी भीती तारीक फारूकी, अशोक कुमार फडतरे या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. टेक्‍स्टाईल उद्योगाला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी संघर्ष समितीचे प्रमुख शेख खालिद गुडू यांनी व्यक्त केले आहे. शासनाने यंत्रमाग उद्योग व्यवसाय टिकवण्यासाठी सबसिडी व वीजपुरवठा दरात कपात करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर कापड उद्योगासाठी लागणाऱ्या सुताचे दर स्थिर ठेवणे आवश्‍यक आहे, असे मत व्यापारी खालिद गुडू यांनी व्यक्त केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT