OBC Reservation : भाजपाचे कल्याण मध्ये सरकार विरोधात आंदोलन  sakal
मुंबई

OBC Reservation : भाजपाचे कल्याण मध्ये सरकार विरोधात आंदोलन

राज्यातील महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे

रविंद्र खरात

कल्याण : ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे आज 15 सप्टेंबर रोजी कल्याण तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत.

इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला महाविकास आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत . ओबीसी आरक्षण समवेत विविध विषयांवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असून आज बुधवार ता 15 सप्टेंबर रोजी कल्याण तहसिलदार कार्यालय समोर भाजपच्या वतीने आंदोलन केले.

भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे , आमदार रविंद्र चव्हाण , माजी आमदार जगन्नाथ पाटील, नरेंद्र पवार, मनोज राय, प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन म्हात्रे, समवेत शेकडो भाजपा माजी नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार रविंद्र चव्हाण यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार हल्ला बोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT