Mantralaya 
मुंबई

शिक्षक भरतीचा वाद पेटला! एका व्यक्तीनं मंत्रायातील संरक्षण जाळीवर घेतली उडी

या व्यक्तीनं दोन प्रमुख मागण्यांकडं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा प्रकार केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : रखडलेली शिक्षक भरती लवकर सुरु करावी तसेच कंत्राटी भरती प्रक्रीया राबवू नये यासाठी एका व्यक्तीनं मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उडी घेतल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलकांकडून अशा प्रकारे जाळीवर उड्या मारण्याचं प्रमाण वाढलं आहे. (Maharashtra teachers recruitment dispute a person jumped on the safety net of the Mantralaya)

पोलिसांनी घेतलं ताब्यात

शिक्षक भरती तात्काळ सुरु करावी तसेच कंत्राटी भरती तात्काळ बंद करावी यासाठी या व्यक्तीनं आंदोलन केलं. आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्यानंतर मंत्रालयात लावण्यात आलेल्या संरक्षक जाळ्यांवर त्यानं उडी घेतली, तसेच घोषणाबाजीही केली. पोलिसांनी विनंती करुनही तो बाहेर येत नसल्यानं अखेर एका पोलिसानं स्वतः या जळीवर उडी घेत त्याला ताब्यात घेतलं. (Marathi Tajya Batmya)

सरकारनं काढला होता जीआर

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं कंत्राटी भरतीसाठीचा एक शासन निर्णय काढला होता. या निर्णयाला सर्व वर्गातून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला. यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोपही झाले होते. यापार्श्वभूमीवर या व्यक्तीनं उडी घेताना ही कंत्राटी भरती बंद करण्याची मागणी केली. (Latest Sport News)

वारंवार घडताहेत घटना

यापूर्वी देखील एका शेतकऱ्यानं अशाच प्रकारे संरक्षण जाळीवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानं देखील या कृतीद्वारे सरकारसमोर आपल्या मागण्या ठेवत जाब विचारला होता. पण हे प्रकार वाढल्यानं मंत्रालयातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

शिक्षकांमधील रोषाची दखल घ्या - सत्यजीत तांबे

शिक्षक भरतीचा मुद्दा सरकारने गंभीरपणे घ्यायला हवा. एककीडे संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १८ हजार पदं रिक्त आहेत. तर माध्यमिक, उच्च माध्यमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या शाळांमधील एकूण ६० हजार जागा रिक्त आहेत. ही पदं लवकरात लवकर भरण्याऐवजी सरकारनं कंत्राटी भरतीचा विषय मध्येच उकरून काढला आहे. हे मुख्य मुद्द्याला फाटे फोडण्याचे प्रकार आहेत.

याआधीही मंत्रालयात अशाच प्रकारची आंदोलनं झाली. याबाबत मी भरपूर वेळा पत्र दिलं आहे, अधिवेशनातही हा मुद्दा मांडला होता. पण सरकारने अजून तरी त्याची दखल घेतलेली नाही. सरकारने आता तरी शिक्षकांमधील या रोषाची दखल घेऊन तातडीने भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती मी शालेय शिक्षणमंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना करतो, असं आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT