मुंबई

कालिना कॅम्पसचे नामकरण 'अण्णाभाऊ साठे विद्यानगरी' करा; वाचा कोणी केली 'ही' मागणी

तेजस वाघमारे


मुंबई : साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीची सांगता शनिवारी (1 ऑगस्ट ) होत आहे. या दिनाचे औचित्य साधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सांताक्रूझ येथील मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसचे नाव साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी असे करावे, अशी मागणी आंबेडकरी लोक संग्रामने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हे सूत्र आपल्या वाणीच्या व लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीत रुजवणाऱ्या अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा आवाज बुलंद केला होता. प्रस्थापित व्यवस्थेने मागास ठरवलेली जात अण्णाभाऊंच्या वाट्याला आली. या जात व्यवस्थेचे चटके त्यांच्या कैक पिढ्यांनी वाटेगावपासून अनुभवले. झोपडपट्टीतले किड्यामुंग्यांचे जगणे पाठीवर घेऊन गुदमरलेला श्वास कसा मुक्त करता येईल यासाठी अण्णाभाऊंनी अखेरपर्यंत आपली लेखणी झिजवली. त्यांच्या फकीरा या एकाच कांदबरीने साहित्यविश्वाला अक्षरशः जिंकले आहे. आज ती कांदबरी अजरामर ठरली आहे. जगभरात अण्णाभाऊंचा जन्म शताब्दी सोहळा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांचा गौरव म्हणून मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसचे नाव अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा, अशी मागणी आंबेडकरी लोक संग्राम संघटनेने प्रा. डॉ जो के डोंगरगावकर, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ आणि अच्युत भोईटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या एका निवेदनात केली आहे.

अण्णाभाऊ साठे यांना वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत अक्षरांची ओळख नव्हती. केवळ दीड दिवसांची शाळा अण्णाभाऊंनी पाहिली. तरीही अफाट आणि अन् अचाट शब्दसामर्थ्याने उपेक्षित, वंचित, गरीब, कष्टकरी अशा सर्वहारा समुहाच्या वेदनेचा ठाव त्यांनी घेतला. हतबल जगणं, दुःख्ख आणि गलितगात्र परिस्थितीचा हुंकार बनून त्यांची लेखणी आग ओकत राहिली. तिने प्रस्थापित साहित्याला जबरदस्त हादरे दिले, याची आठवण संघटनेने सरकारला निवेदनाद्वारे करून दिली आहे.

--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT