मुंबई

सरकारच्या एका अटीमुळे मॉल पुन्हा बंद

नामदेव कुंभार

15 ऑगस्टपासून राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामध्ये राज्यभरातील मॉल सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी आणि ग्राहकांना लसीच्या दोन डोसची अट ठेवण्यात आली आहे. या एका अटींमुळे राज्यातील अनेक ठिकाणाचे मॉल बंद आहेत. कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस न झाल्यामुळे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने (Federation of Retail Traders Welfare Association) घेतला आहे.

मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेले अन् 14 दिवस पूर्ण झालेले असावेत, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. पण मॉलमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसल्यामुळे मॉल सुरू करणे शक्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पुण्यासह अनेक ठिकाणाचे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक केल्यामुळे मॉल, शॉपिंग सेंटर बंदच ठेवावी लागणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होण्यास अजून किमान एक महिना लागण्याची शक्यताही संघटनेने व्यक्त केली. तसेच लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध असेल तरच हे लसीकरण पूर्ण होऊ शकते, असेही संघटनेने म्हटले आहे. कोरोना संकटामुळे मागी वर्षभरापासून मॉल बंधच आहेत, त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपली अट शिथिल करुन एक डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांसह मॉल सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

Jaykumar Gore: साेलापुरातील प्रभाग सातसह शहरात भाजपच जिंकेल: पालकमंत्री जयकुमार गोरे; विकासामुळे नागरिक भाजपसोबत...

Sinhagad Fort : पर्यटकांना सिंहगडाचा मोह आवरेना; सुमारे एक लाख जणांची २० दिवसांत भेट

SCROLL FOR NEXT