Navi Mumbai traffic  sakal
मुंबई

Navi Mumbai: वाहतुकीची कोंडी कायम; लाखो रुपयांचे सिग्नल केवळ 'शो' चे

सिग्नल यंत्रणा निष्क्रिय; वाढत्या वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रणाचे प्रश्नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai: कळंबोली,कामेठा व खांदेश्वर सिडको वसाहतीतील लाखो रुपये खर्च करून वाहतुक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी सिडकोने वसाहतीमधील जवळपास आठ ते दहा चौकात सिग्नल लावले.

मात्र अनेक वर्षापासून हे सिग्नल सुरुच नाहीत. केवळ नावापुरतेच सिग्नल लावण्यात आले असून शहरातील प्रत्येक चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होते.

सामाजिक कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी अंदोलने व पत्रव्यवहार करून प्रशासनाकडून सिग्नल व्यवस्था सुरू करूवून घेतली.

मात्र उद्घाटन झाल्याच्या काही दिवसात ही यंत्रणा बंद पडल्याने त्याचा कुठलाही ऊपयोग झाला नसून संबंधित विभागाचा लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे. या त्या मुळेच सध्या प्रशाक असलेली पालिका व नवी मुंबई वाहतूक विभाग या कडे वक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कळंबोली व खारघर शहरात सायन पनवेल हायवेवरील चौक ,कामोठा पोलिस ठाणे चौक, कळंबोली येथील पोलिस निवारा चौक व खांदेश्वर येथील रेल्वेपुलाचा चौक हे मुख्य चौक आहे. याच चौकात मुख्य बाजारपेठ असून अनेक कपड्यांची दुकाने, मेडिकल, किराणा, भाजीपाला व इतर महत्त्वाची दुकाने असल्यामुळे खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांसह शहरवासीयांची दररोजच गर्दी होते.

यासोबतच इतरही चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे शहरात सिग्नल व्यवस्थेची मागणी होत होती. त्या अनुषंगानेच सिडकोने लाखो रुपये खर्चुन सिग्नल लावले. रस्त्यावर चारही बार्जुना झेब्रा क्रॉसिंगच्या पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या. सुरुवातीला काही दिवस सिग्नल लागलेले दिसून आले. परंतु दोन ते तिन वर्ष उलटून गेले तरी अद्यापही शहरातील कोणत्याच चौकात सिग्नल व्यवस्था सुरळीत सुरू झालेली नाही. बहुतांश चौकात वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी काही ठराविक काळापर्यतच दिसतात. तसेच कळंबोली खांदेश्वर व कामोठा येथील चौकातून अवजड वाहतुक होत असल्याने देखील वाहतुक विस्कळीत होते व सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

तसेच या ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडे अवजड वाहनातून आलेल्या मालाच्या गाड्या देखील रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात. दुकानदार दकानाबाहेरची जागा अडवून ठेवतात. त्यातच हातगाडे, अशा गदारोळात गाडयांचे पार्कींग होत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.त्या मुळेचदिवसेंदिवस वसाहतीमधील वाहतुकीची समस्या कमी होण्याएऐवजी जटील होत चालली आहे. त्यामुळे अनेकवेळा

किरकोळ अपघतही होत आहेत. शहरात वाहतूक शाखेचे कर्मचारी नित्यनेमाने सेवा बजावित आहेत. तरी लाखो रूपये खर्च करून लावलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT