मुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असल्याचा अहवाल दिल्यानंतर मराठा आरक्षण प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासह इतर प्रमुख वीस मागण्या घेऊन मराठा क्रांती मोर्चा उद्या (ता.२६) विधानभवनावर धडकणार आहे.
यासाठी राज्यभरातील जिल्हा समन्वयकांनी १६ नोव्हेंबरपासून गावोगावी मराठा संवाद यात्रा काढून जनजागृती केली आहे. प्रत्येक गावखेड्यातून मराठा आंदोलक वाहनाने मुंबईकडे रवाना होणार असून, सरकार विरोधात निर्णायक भूमिका घेण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. मोर्चातील अनेक मागण्यांपैकी मराठा आरक्षण, कोपर्डीतल्या आरोपींना फाशी, ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखणे, मराठा विद्यार्थी व बेरोजगार युवकांचे प्रश्न, शेतमालाला हमीभाव व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आदी वीस मागण्या समाजाने सरकारकडे सातत्याने मांडलेल्या आहेत. मात्र, त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. आरक्षणाबाबत घटनात्मक निकष पूर्ण केल्यानंतरही प्रत्यक्ष आरक्षणाचा लाभ मिळेल का नाही, अशी साशंकता मराठा समाजात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.