मुंबई

अतिताणामुळे मध्य रेल्वे आजारी

मयूरी चव्हाण-काकडे

डोंबिवली - मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे म्हणजेच लाखो चाकरमान्यांची ‘जीवनवाहिनी’! ती बिघडली, तर प्रवासी तिचा उद्धार करतात अन्‌ रेल्वे सेवा पूर्ववत होऊन प्रवास संपला, की जीवनचक्रात गुंतून जातात. रेल्वेचे जीवनचक्र मात्र रात्रभर सुरूच असते. लोकलच्या वाढलेल्या फेऱ्या, वाढलेला वेग, मालगाड्यांचे वाढलेले वजन, प्रवाशांची वाढती लोकसंख्या आणि तुलनेत कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, निधीची अडचण, जुनाट यंत्रणा, देखभालीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे रेल्वेचे अपघातसत्र सुरू आहे. अतिताणामुळे मध्य रेल्वे आजारी पडली आहे, असे मत रेल्वेच्या अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

कल्याण-कसारा मार्गावर वारंवार बंद पडणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्या, रेल्वे रुळावरून मालगाडी किंवा इंजिनची होणारी घसरगुंडी, कल्याण-विठ्ठलवाडीच्या लोकलचे डबे घसरून झालेला अपघात, काही महिन्यांपूर्वी आसनगाव-वासिंददरम्यान नागपूर-दुरांतो एक्‍स्प्रेसला झालेल्या अपघातामुळे रूळांची, लोकलची आणि संपूर्ण रेल्वे यंत्रणेच्याच देखभालीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच मध्य रेल्वेवर वारंवार रूळाला तडे जाणारे, सिग्नल यंत्रणेत बिघाड आदी बाबींमुळे मध्य रेल्वेचे रडगाणे कायमचे झाले आहे; मात्र, रेल्वे रूळाची रचना, डब्याखालील आधार यंत्रणा आणि या यंत्रणेवर रोज पडणारा अतिरिक्त ताण यांपासून सामान्य प्रवासी अनभिज्ञ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

कल्याण-कसारा-कर्जत या मार्गाचे चौपदरीकरण होणे गरजेचे आही. रेल्वेने वेळेत उपायोजना न केल्यामुळे या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ठोस उपायोजनेअभावी भविष्यात दुर्देवाने आणखी अपघात होण्याची शक्‍यता आहे.
- यशवंत जोगदेव, रेल्वेचे अभ्यासक

मध्य रेल्वेचे प्रवासी दिवसेंदिवस वाढत आहेत; मात्र, त्या तुलनेत येथील सुविधा वाढत नाहीत. तसेच आहे त्या सोईसुविधांचाही वेळेनुसार मेंटेनन्स राखला जात नाही; निदान आहे त्या उपाययोजनांची देखभाल करणे आवश्‍यक आहे. 
- संजय मेस्त्री, सदस्य,  उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघटना 

प्रवाशांनी भरलेल्या लोकलचे वजन साधारण ५०० टन, तर मालगाडीचे वजन ४५०० टनहूनही अधिक असते. उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या सोळाशेहूनही अधिक फेऱ्या दिवसाला होतात. १२ डब्यांच्या गाडीला जवळपास ९६ चाकं असतात. ती  रोज रूळाच्या संपर्कात येऊन लवकर निकामी होतात.
- आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT