uddhav-koshiyari.jpg
uddhav-koshiyari.jpg 
मुंबई

ठाकरे सरकार आणि राज्यपालांमधली भेट टळली कारण...

दीनानाथ परब

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये होणारी भेट टळली आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेते आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. पण राज्यपाल डेहराडूनला निघून गेल्याचं राजभवनातून कळवण्यात आलं आहे. त्यामुळे ही भेट टळली आहे. राज्यपाल आणि मविआ सरकारची भेट टळल्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. याआधी बारा आमदारांची नियुक्ती असो किंवा हॅलिकॉप्टरचा वापर यावरुन राज्यपास आणि मविआ सरकारमधील मतभेद स्पष्टपणे समोर आले होते. 

काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. "आम्ही राज्यपालांना भेटून वेगवेगळया घटनांची माहिती दिली. मुख्यमंत्री बोलत नसतील, तर संवैधानिक प्रमुख म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलत केलं पाहिजे त्यांच्याकडून अहवाल मागवून घ्यावा. खंडणी असो किंवा बदली रॅकेटमध्ये काय कारवाई केली, याची माहिती राज्यपालांनी घ्यावी. त्यासाठी आम्ही राज्यपालांना भेटलो", असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.  

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरण त्यानंतर मनसुख हिरेनची हत्या या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयएकडे आहे. विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या मुद्यावरुन ठाकरे सरकारची कोंडी केली आहे. त्याशिवाय फडणवीस यांनी पोलीस बदल्यांमध्येही काही गंभीर आरोप केले आहेत. या सर्व मुद्यांवर आपली बाजू मांडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती दिली होती. पण राज्यपालच डेहराडूनला निघून गेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा राज्यपालांची भेट घेऊन राज्यात काही दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT