मुंबई

मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नावर मंत्रालयात बैठक, पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संतप्त

संदीप पंडित

भाईंदर ः गेले काही दिवस मीरा-भाईंदर शहराचा पाणी पुरवठा विस्कळित झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नावर विविध पक्ष आवाज उठवत आहेत. माजी विरोधी पक्षनेता आसिफ शेख यांनी उपमुखमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली होती. त्यानुसार आज (सोमवारी) भाईंदरच्या पाणी प्रश्नावर मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे. 

मीरा भाईंदर मध्ये अपुऱ्या पाण्याने लोकांचे हाल होत आहेत. मीरा भाईंदर महानगर पालिकेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 150 द. ल. मि.ली. पाणी मिळावे अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे. आमदार सरनाईक यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची रविवारी मंत्रालयात भेट घेतली व मीरा भाईंदरच्या पाणी समस्या बाबत सविस्तर चर्चा केली. आमदार सरनाईक यांनी केलेल्या विनंतीनुसार मंत्री सुभाष देसाई यांनी सोमवार (ता. 19) मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीचे आदेश दिले आहेत. या बैठकीला खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, महापौर ज्योत्सना हसनाळे, माजी आमदार मुझफ्फर हुसैन, आयुक्त विजय राठोड तसेच पालिका पदाधिकारी यांना या बैठकीस निमंत्रित करण्यात येणार आहे. 

25 एमएलडी पाणी कायमस्वरूपी मिळणार - 
मिरा भाईंदर शहराचा एमआयडीसीने बंद केलेला 25 एमएलडी पाणी पुन्हा मिळवून देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री दर्जा व मिरा भाईंदर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते डॉ. आसिफ शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना मिरा भाईंदर शहराच्या पाणी समस्या बाबत माहिती दिली असता अजित पवार यांनी हे आश्वासन दिले. 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT