file photo 
मुंबई

आरेमधील कारशेडचा वाद पुन्हा पेटणार? 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरे वसाहतीमधून मेट्रो-3 ची कारशेड अन्य ठिकाणी नेता येईल का, याबाबत राज्य सरकारने समिती नेमली होती. या समितीने अहवाल सादर केला असून, कारशेड अन्य ठिकाणी घेऊन जाणे व्यवहार्य होणार नसल्याची शिफारस केली आहे. त्याबाबत पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला असून, कारशेड आरे वसाहतीत उभारण्याचा निर्णय झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

आरे वसाहतीमधील मेट्रो कारशेडसाठी एका रात्रीत 2000 झाडे तोडण्यात आली होती. त्याला पर्यावरणप्रेमींनी प्रचंड विरोध केला होता व शिवसेनेनेही विरोध दर्शवला होता. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली व अभ्यास करण्यासाठी चार जणांची समिती नेमली होती. या समितीने मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे.

मेट्रो-3 प्रकल्पातील कारशेड आरे वसाहतीमधून इतर ठिकाणी घेऊन जाणे व्यवहार्य नसल्याचे या समितीने अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आरे वसाहतीमधील कारशेडचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तेथे कारशेडचे काम पुन्हा सुरू झाल्यास पूर्वीपेक्षा अधिक तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणवादी कार्यकर्ते संदीप परब यांनी दिला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करणे बंधनकारक नसल्याचे सांगितले. अहवालाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT