RAJ THACKERAY 
मुंबई

मोदी सरकारनं जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवरून मनसेचा भाजपला टोला...विचारला 'हा' प्रश्न... 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात सापडलं आहे. जगभरात कोरोनाचे तब्बल ४३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत तर ३ लाखांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या परिस्थतीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या निर्णयावर टीका करत सरकारला एक सवाल केलाय. 

देशातल्या बहुतांश विरोधी पक्षांनी या पॅकेजला जनतेला फसवणारं पॅकेज म्हंटलं आहे. मात्र भाजपपासून वेगळं होऊन महाविकास आघाडीत गेलेल्या शिवसेनेनं केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईसाठी वेगळं पॅकेज देण्याची मागणी केली आहे. मनसेनं केंद्र सरकारला  यावरून टोला लगावलाय. 

पीएम केअर फंडासाठी एवढी जाहिरात का करता?

'२० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतरही पीएम केअर फंडासाठी एवढ्या जाहिराती का करता'? असा अडचणीत टाकणारा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केंद्र सरकारला विचारला आहे. 

त्यामुळे आता मनसेनं विचारलेल्या या कठीण प्रश्नाचं उत्तर केंद्र सरकार देतं का हे बघणं महत्वाचं असणार आहे.

जगभरातले विकसित देश कोरोना व्हारासपुढे हतबल झाले आहेत. भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या गरिबांसाठी आणि कोरोनापासून देशाचा बचाव करण्यासाठी तब्बल २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र देशातल्या विविध राजकीय पक्षांकडून आता यावर टीका होत आहे. 

mns criticized central government on 20 lac crore package read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT