मुंबई

'शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्यासोबत'; मनसेचा घणाघात

तुषार सोनवणे

मुंबई  - राज्यात वीजबिलाचा प्रश्न पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष राज्य सरकारविरोधात आंदोलने करीत आहेत. यावरून शिवसेना नेते अनिल परब यांनी मनसेवर घणाघाती टीका केली आहे. मनसे सुपारीबाज पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले होती. परब यांची टीकेला मनसेनेही प्रत्युत्तर दिले आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपारीबाज पक्ष असून सुपारी घेतल्याशिवाय ते काम करू शकत नाही असे अनिल परब म्हणाले होते. त्याला उत्तर देताना,  'शिवसेनेने हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना स्वबळावर सत्ता आणणार असे सांगितले होते. परंतु त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या जिवावर सत्ता स्थापन केली. शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्यासोबत अशी घणाघाती टीका संदीप देशपांडे .यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केली.

कृष्णकुंज चं महत्व वाढल्याने शिवसेनेच्या पोटात दुखत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांनी मनसेला प्रस्ताव दिला होता. शिवसेनेने धोकाबाजी केल्यामुळे त्यावेळी युती झाली नाही. शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकारुपी पोपटात अडकला आहे.  असंही देशपांडे यांनी म्हटले.

अनिल परब नेमकं काय म्हणाले होते?

“पारी घेतल्या शिवाय मनसे कोणतही काम करत नाही. त्यांचे अस्तित्व त्यावरच आहे. अशा शब्दात परीवहन मंत्री ऍड.अनिल परब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाढीव वीज बिलांविरोधात छेडलेल्या आंदोलनावरुन ऍड. अनिल परब यांनी या हा हल्ला चढवला होता. 

MNSs Sandeep Deshpande responds strongly to Anil Parbas criticism

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Lok Sabha Poll : शिवसेनेकडून सात नवे चेहरे रिंगणात; एकनाथ शिंदे यांची रणनीती; चार खासदारांचे तिकीट कापले

Ranveer Singh : रणवीरने सोशल मीडियावरून हटवले त्याच्या लग्नाचे फोटो ; चाहत्यांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Lok Sabha Poll 2024 : जाळलेल्या ईव्हीएममधील ४१० मते सुरक्षित; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

SCROLL FOR NEXT