Money
Money 
मुंबई

जप्त केलेले सहा कोटी रुपये "हवाला'चे?

सकाळवृत्तसेवा

मुंबई - लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर झवेरी बाजार व ऑपेरा हाऊस परिसरातून जप्त करण्यात आलेल्या सुमारे सहा कोटी रुपयांवर अद्याप कोणीही दावा केलेला नाही. त्यामुळे ही रक्कम हवाला व्यवहारातील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने मुंबईतून 14 कोटी आणि पुण्यातून चार कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने राज्यभर कारवाई करून 40 कोटींहून अधिक बेहिशेबी रक्कम जप्त केली आहे. मुंबईतील झवेरी बाजार व ऑपेरा हाऊस हे परिसर आर्थिकदृष्ट्या संवेदनशील समजले जातात. निवडणुकीच्या काळात या ठिकाणी प्राप्तिकर विभागाची करडी नजर असते. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर ऑपेरा हाऊस येथे एका आणि झवेरी बाजार येथे चार ठिकाणी कारवाई करण्यात आली.

झवेरी बाजार येथील एका गाळ्यावर छापा टाकण्यात आला. त्या वेळी तेथील एका बॅगेत सुमारे अडीच कोटींची बेहिशेबी रक्कम सापडली होती. ती रक्कम आपली नसल्याचा दावा गाळेमालकाने केला होता. प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत जप्त केलेल्या रकमेपैकी सुमारे सहा कोटी रुपयांवर अद्याप कोणीही दावा केलेला नाही. या परिसरात अंगडिया व्यावसायिकांचे मोठे जाळे असून, हवाला व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो. ही रक्कम त्यातील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया
आतापर्यंत मुंबईतून 14 कोटी आणि पुण्यातून सुमारे चार कोटींची बेहिशेबी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्यातील काही रकमेवर अद्याप कोणीही दावा केलेला नाही.
- संतोष माणकोसकर, सहायक संचालक (अन्वेषण), प्राप्तिकर विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT