मुंबई

Mumbai Accident: भीषण अपघात! वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलनाक्यावर चार गाड्यांची धडक; 4 प्रवाशी गंभीर जखमी

कार्तिक पुजारी

मुंबई- मुंबई वांद्रे-वरळी सी लिंक टोलनाक्यावर मोठा अपघात झाला आहे. तीन ते चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. काही गाड्या टोलनाक्याजवळ थांबल्या होत्या. यावेळी मागून आलेल्या एका गाडीने जोराची धडक दिल्याची माहिती आहे. यात १० ते १२ जण जखमी झालेत, तर चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, सी लिंक वरील टोल नाक्यावर हा अपघात झाला आहे. टोल नाक्यावर उभ्या असलेल्या दोन ते तीन गाड्यांना मागून वेगाने आलेल्या गाडीची जोरदार धडक बसली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. चार जण अपघातात गंभीर जखमी झाले आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वांद्रे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. (Mumbai Accident Horrific accident at Bandra Worli Sealink toll plaza 4 passengers seriously injured )

अपघात इतका भीषण होता की दोन गाड्यांचा पूर्ण चुराडा झाला आहे. तर दुसऱ्या दोन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागून वेगाने येणाऱ्या चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं बोललं जातंय.( Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT