मुंबई

Mumbai Accident: भीषण अपघात! वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलनाक्यावर चार गाड्यांची धडक; 4 प्रवाशी गंभीर जखमी

कार्तिक पुजारी

मुंबई- मुंबई वांद्रे-वरळी सी लिंक टोलनाक्यावर मोठा अपघात झाला आहे. तीन ते चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. काही गाड्या टोलनाक्याजवळ थांबल्या होत्या. यावेळी मागून आलेल्या एका गाडीने जोराची धडक दिल्याची माहिती आहे. यात १० ते १२ जण जखमी झालेत, तर चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, सी लिंक वरील टोल नाक्यावर हा अपघात झाला आहे. टोल नाक्यावर उभ्या असलेल्या दोन ते तीन गाड्यांना मागून वेगाने आलेल्या गाडीची जोरदार धडक बसली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. चार जण अपघातात गंभीर जखमी झाले आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वांद्रे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. (Mumbai Accident Horrific accident at Bandra Worli Sealink toll plaza 4 passengers seriously injured )

अपघात इतका भीषण होता की दोन गाड्यांचा पूर्ण चुराडा झाला आहे. तर दुसऱ्या दोन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागून वेगाने येणाऱ्या चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं बोललं जातंय.( Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal CM: पश्चिम बंगालमध्ये BJP सरकार स्थापन करणार! मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची तारीखही ठरली; ब्रिगेड ग्राउंड साक्षीदार ठरणार

IPL 2026 : रोहित शर्मा पुन्हा Mumbai Indians चा कॅप्टन? हार्दिकनंतर सूर्यकुमार यादवही MI vs RCB सामन्याला मुकणार?

Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक नेहमीच करतात भेदभावाचा सामना; समाजात मिळतो अपमान, पण करियरमध्ये घेतात भरारी, बनतात लखपति

Mumbai Airport News: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! मुंबई विमानतळ पूर्णपणे बंद राहणार; का आणि कधी? जाणून घ्या...

IPL 2026 : हार्दिक पांड्याने Mumbai Indians च्या इतर खेळाडूंसोबत रायपूरला नाही गेला; RCB विरुद्ध नाही खेळणार? नेमकं काय सुरू आहे?

SCROLL FOR NEXT