Mumbai news esakal
मुंबई

Mumbai : कच-यापासून बायोगॅस आणि खतनिर्मिती

महालक्ष्मी गोराई केंद्रावर प्रक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई महापालिकेने कचरा मुक्त मुंबईसाठी महालक्ष्मी, गोराई या केंद्रावर कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया, बायोगॅस अन् खत निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांवरून डंपिंग ग्राऊंडवर जाणार्‍या कचर्‍याचे प्रमाण कमी होणार असून दुर्गंधीसारख्या समस्याही कमी होण्यास मदत होईल असा विश्वास पालिका प्रशासनाला आहे.

कचरा मुक्त मुंबईसाठी पालिकेने २ ऑक्टोबर २०१७ पासून सोसायट्यांना कचर्‍याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले. यामध्ये २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि १०० किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणार्‍या इमारती-आस्थापनांना ओल्या कचर्‍याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच २०३० पर्यंत कचरा मुक्त मुंबई हे उद्दीष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे.

या पार्श्वभूमीवर आता महालक्ष्मी आणि गोराई कचरा स्थानांतरण केंद्रावर अद्ययावत पद्धतीने कचर्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे. महालक्ष्मी येथे दररोज महालक्ष्मी केंद्रावर दररोज ६२५ मेट्रिक टन तर गोराई ३५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. यासाठी आराखडा तयार करण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

मुंबईतील ६ हजार मेट्रिक टनांच्या कचर्‍यापैकी सुमारे २ हजार मेट्रिक टन कचरा हा सहा ठिकाणी असणार्‍या कचरा हस्तांतरण केंद्रांवर छोट्या वाहनांमधून जमा केला जातो. यानंतर मोठ्या वाहनांमधून डंपिंग ग्राऊंडवर नेऊन विल्हेवाट लावली जाते. मात्र वर्सोवा, गोराई, कुर्ला आणि महालक्ष्मी येथे असणार्‍या कचरा हस्तांतरण केंद्रांच्या ठिकाणी जमा होणार्‍या कचर्‍यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. शिवाय रोगराई पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे या ठिकाणी कचरा पुनप्रक्रिया करणारी ‘आदर्श कचरा हस्तांतरण केंद्र’ बनवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दुर्गंधी कमी होणार

हस्तांतरण केंद्रावर सुका कचरा, ओला कचरा असे विलगीकरण होईल. यानंतर प्लास्टिकच्या कचर्‍यापासून पायरोलेसिस तंत्रज्ञानाने प्रक्रिया करून इंधन ऑइल तयार होणार आहे. शिवाय टाइल्स, पेव्हर ब्लॉक, विटा अशा वस्तू बनवल्या जातील. ओल्या कचर्‍यापासून खत आणि बायोगॅस प्रकल्प उभारले जातील. ही सर्व कामे कचरा हस्तांतरण केंद्र बंदिस्त करून केली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील दुर्गंधी, रोगराईचा धोका टळण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

Satara Politics: काहींना न्याय देऊ शकलो नाही: खासदार उदयनराजे भोसले; नाराज असलेल्याबाबत नेमकं काय म्हणाले?

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT