Mahavitran
Mahavitran Sakal
मुंबई

Mumbai : राज्यात साडेतीन कोटींच्या वीज चोऱ्या उघड;महावितरणच्या कारवाईत ३८३ प्रकरणे उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यातील वाढत्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या विशेष मोहिमेत राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

या वीजचोरी प्रकरणात या वीजचो-या प्रकरणी अंदाजे ३ कोटी ५० लाख रूपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली.

या विशेष तपासणी मोहिमे दरम्यान एकुण ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. या वीजचोरी प्रकरणांमध्ये मोठया प्रमाणात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात ही मोहिम राज्यभरात सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे प्रभारी कार्यकारी संचालक मुंबई सुमित कुमार यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली आहे.

भविष्यात अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याने ग्राहकांनी वीजचोरी न करता वीजेचा अधिकृत वापर करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT