work four days week esakal
मुंबई

Mumbai : पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा प्रस्ताव

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांची कामाची गुणवत्ता आणि खर्च सुधार धोरणानुसार पाच दिवसांच्या आठवड्याचे धोरण राज्य शासनाने अंगिकारलेले होते. मात्र,आता पाच दिवसांच्या आठवडा रद्द करण्याचा प्रस्ताव आलेला आहे. या प्रस्तावाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने विरोध केला आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक स्वास्थ्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर, पाच दिवसांच्या आठवड्याचे धोरण राज्य शासनाने अंगिकारलेले आहे. संघटनांच्या आग्रही मागणी व अथक पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने, राज्य शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू करीत असताना, कार्यालयीन वेळेत देखील दररोज ४५ मिनिटांची वाढही केली आहे. या धोरणामुळे प्रशासकीय गतिमानता आणि शासन धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये वाढलेली परिणामकारकता केंद्राप्रमाणेच राज्यात देखील दिसून आली आहे. राज्यात अशी प्रशासकीय सुस्थिती असताना, पाच दिवसांच्या आठवडा रद्द करण्याचा प्रस्ताव येणे अत्यंत्य चुकीचे आहे.

पाच दिवसांच्या आठवड्याने मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांनी या पाच दिवसांच्या आठ्वड्याबाबत अडचणी वाढत असल्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली होती. ह्या अडचणी लक्षात घेऊन पाच दिवसांच्या आठवडा रद्द करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. या प्रस्तावाला मान्यतासाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. मात्र, प्रस्ताव येण्याअगोदर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने जोरदार विरोध केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT