मुंबई

मुंबईकरांची कडक उन्हामुळे होरपळ? तर जाणून घ्या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वातावरणाची स्थिती

समीर सुर्वे


मुंबई : मुंबईसह उपनगरांत सोमवारपर्यंत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे दोन दिवसांनी तापमानात किंचित वाढ होण्याची शक्‍यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्‍यता असून, रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे तेथे अंबर अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत काही अधून मधून पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तर, कुलाबा येथे आज कमाल 29.6 आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ येथे किमान 30.9 आणि कमाल 24.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत सोमवारपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे. मुंबईत उद्याही तापमान याच पातळीवर राहण्याची शक्‍यता असून, शनिवारी तापमानात किंचित वाढ होईल, असा अंदाज आहे.

दक्षिण कोकणात अंबर अलर्ट जारी
महामुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्‍यता असली, तरी दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. रविवारपर्यंत या भागात जोरदार पाऊस, तर रविवारपासून मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. काही भागात 204 मि.मी. पर्यंत पावसाची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबई वेधशाळेने अंबर अलर्ट जारी केला असून नाविक दल, तटरक्षक दल, तसेच स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT