मुंबई : मुंबईसह उपनगरात होत असलेल्या मुसाळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीवरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनीटं उशीराने धावत आहेत.
शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर काही प्रमाणात पाणी साचल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका मध्य रेल्वेला बसला असून अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर परिणाम झाला असून लोकल ट्रेन १० ते १५ मिनीटं उशिराने धावत आहेत. मेन लाईन, हार्बर मार्गावर देखील पाऊस असून तरीही सर्व मार्गावर ट्रेन्स सुरु असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या सेक्शन मध्ये लोकल ट्रेन्स उशिराने धावत आहेत.
मुंबईसह उपनगरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आणि याचा परिणाम म्हणून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. संध्याकाळची वेळ असल्याने कामावरून घराकडे निघालेल्या नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.