Mumbai Local News sakal
मुंबई

Mumbai Local: हुश्श... पश्मिम रेल्वेचे काम अंतिम टप्यात ; सर्वसामान्यांचे हाल होणार कमी

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local: पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सुरू असलेला ब्लॉक आता अंतिम टप्प्यात आला आहे. गेले आठवडाभर लोकल रद्द झाल्याने वेठिस धरलेल्या प्रवाशांना शेवटचे दोन दिवस आणखी त्रास सहन करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर आज ९३ लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांचा ब्लॉक घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू केले आहे. यादरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द केल्या आहे. प्रवाशांची होणारी कोंडी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने रद्द केलेल्या ३१६ लोकल सेवा पूर्ववत करण्यावर भर दिला आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी रद्द केलेल्या काही लोकल पूर्ववत केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर शनिवारी ९३ लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन दिवसांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी करणार आहेत. या पाहणीनंतरच सहावी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update: पुढील चार दिवसांत पाऊस कसा असेल? हवामान विभागाने दिला अंदाज

SSC HSC Supplementary Result : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी होणार जाहीर

ST Bus: पंढरपूर वारीसाठी एसटीची धाव! राज्यभर ५५०० विशेष बसचे नियोजन; महिलांना ५०% सवलत, तर 'या' प्रवाशांना मोफत प्रवास

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात; पहिल्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदविली

IND vs ENG: 'T20 मालिकेतील पराभवाचा वनडेवर परिणाम नाही, कारण...', कर्णधार गिल स्पष्टच बोलला; २०२७ वर्ल्ड कपचीही सांगितली योजना

SCROLL FOR NEXT