मुंबई

देशात 31 नवे विमानतळ होणार : जयंत सिन्हा 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - भारताची वाढत जाणारी लोकसंख्या आणि प्रवासी पाहता भारतात 150 ते 200 विमानतळांची गरज असल्याचे मत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केले. येत्या काळात जवळपास 31 नवीन विमानतळ देशात होणार असून, त्यामुळे एकूण विमानतळांची संख्या ही 106 पर्यंत जाईल.

विमानतळातील गुंतवणूक यावर मुंबईत परिषद होत आहे. त्यावेळी विमानतळांचा होणारा विकास त्यांची गरज, सुरक्षा याविषयी माहिती दिली. सध्या अमेरिकेत 500 तर चीनमध्ये 300 विमानतळं आहेत. हे पाहता आपल्याकडील विमानतळ संख्या फ़ार कमी आहे. भारतात विमान प्रवाशांची संख्या गेल्या 3 वर्षात वाढली आहे.

सध्याच्या घडीला 117 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. पुढील 5 ते 10 वर्षात ती 500 दशलक्षांपर्यंत जाईल. त्यामुळे आणखी 150 ते 200 विमानतळांची गरज भारताला असून, त्यासाठी 2 ते 3 लाख कोटींची गुंतवणूक करणेही तेवढेच आवश्यक असल्याचे सिन्हा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT