मुंबई

सागरी पर्यटनासाठी "बीच सॅक' धोरण 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच सॅक धोरण राबविणार असल्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सोमवारी येथे सांगितले. 

राज्यात बीच सॅक धोरण तयार करण्याबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. येरावार म्हणाले, पर्यटकांना सागरी किनाऱ्यावर राहण्याचा आनंद घेण्याची मनस्वी इच्छा असते. बीच सॅक, हट्‌स, अंब्रेला आदी सुविधा गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना उपलब्ध आहेत. अशा सुविधेला पर्यटकांचा प्रतिसाद मिळत असून, त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. तारकर्ली, शिरोडा-वेळागर, मुरुड-दापोली, गणपतीपुळे, अलिबाग, दिवे-आगार, आक्षी-नागाव, केळवा, बोर्डी आदी ठिकाणी विस्तीर्ण समुद्र किनारे आहेत. या ठिकाणी पर्यटकांना बीच सॅक, हट्‌स, अंब्रेला अशा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता धोरण ठरविण्यासाठी नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र सागरी किनारा नियंत्रण, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, आरोग्य विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषधी विभाग या विभागांची समिती स्थापन करून धोरण ठरविले जाईल. 

सर्व सुविधायुक्त झोपडी 
बीच सॅक म्हणजे समुद्र किनारी तात्पुरत्या स्वरूपात बांबूच्या साह्याने तयार केलेली झोपडी होय. यामध्ये स्वयंपाक घर, फर्निचर, स्वच्छतागृह, आग प्रतिबंधक योजना, प्रथमोपचार आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. "बीच सॅक' सुविधा ही 1 सप्टेंबर ते 31 मे या कालावधीत पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT