Dog Bite sakal
मुंबई

Mumbai News : मुंबईत रोज ७० लोकांना चावताय कुत्रे, धक्कादायक माहिती समोर

सकाळ डिजिटल टीम

Palghar News : भटक्या श्‍वानांचा त्रास सर्वच ठिकाणी नागरिकांना भेडसावत आहे, मात्र त्यांना आवर घालण्यासाठी कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी उपाययोजना अथवा योग्य ते पाऊल उचलण्यात प्रशासन तयार नाही. पालघर जिल्ह्यात भटक्या श्‍वानांनी हैदोस घातला असून दररोज सरासरी ७० नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्याचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये लहान मुले ते आबाल वृद्धांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे.

नगर परिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायतींनी भटक्या श्‍वानांना आवर घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पालघर जिल्हा कार्यालयात कामानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक तालुक्यांतून येतात. त्या नागरिकांनाही भटक्या श्‍वानांनी लक्ष्य केले आहे. लहान मुले व वृद्ध नागरिकांच्या मागे धावत जात कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या भटक्या कुत्र्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

पालघर जिल्ह्यात तीन महिन्यांत शासकीय रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, तब्बल ६,१२२ जणांना श्वानदंश झाला असून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची नोंद आहे; तर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार झालेल्या रुग्णांची संख्यासुद्धा मोठी असल्याचे सांगण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या ३,१८२ असून ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्या २,९४० आहे. पालघर तालुक्यात सर्वाधिक लोकांना कुत्र्याने चावा घेतला असून तीन महिन्यांची आकडेवारी तब्बल २,०९२ आहे. गेल्या तीन महिन्यांत ६,१२२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. म्हणजेच दररोज ७० जणांना कुत्र्यांच्या चाव्याचा सामना करावा लागला. यामध्ये खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतल्याची माहिती उपलब्ध नाही. त्याची आकडेवारी समोर आल्यास या आकड्यांमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. याकरिता प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलणे आवश्‍यक असताना उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

अनेक जण जखमी

भटकी कुत्री समूहाने फिरत असतात. एकत्रित ते एखाद्याच्या अंगावर धावून जात असल्याने नागरिकही भांबावून जातात. तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात, त्यातही ते रस्त्यावर पडल्याने त्यांना इजाही पोहोचत आहे. श्‍वान चावल्यावर नागरिक सहसा सरकारी रुग्णालयाचा आसरा घेतात, तर अनेक जण खासगी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात.

स्थानिक प्रशासनावर जबाबदारी

भटक्या श्‍वानांची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, रेबीज रुग्णांना बरे करणे, देखरेख समिती नेमणे अशी जबाबदारी आहे. मात्र, जवळपास सर्वच महापालिकांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उदासीनता आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत आहे.

लहान मुले, महिला, ज्येष्ठांसाठी भटके श्‍वान त्रासदायक ठरत आहेत. लहान मुलांचा पाठलाग करत असल्याने त्यांना एकटे घराबाहेर सोडणे धोकादायक आहे. प्रशासनाने श्‍वानांचा बंदोबस्त करावा.

- प्रणीत तारे, वसई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT