मुंबई

शेतकऱ्यांना खरिपासाठी तातडीने मदतीचे वाटप

सकाळवृत्तसेवा

उच्च न्यायालयात राज्य सरकारची हमी
मुंबई - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिली जाणारी सरकारी मदत गरजू शेतकऱ्यांना तातडीने दिली जात आहे, अशी हमी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दहा हजारांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र या मदतीसाठी निर्धारित केलेल्या अटी जाचक आणि अनावश्‍यक असल्याचा दावा करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर व न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. सरकारच्या वतीने वकील अभिनंदन वग्यानी यांनी योजनेचा तपशील न्यायालयात दाखल केला. यानुसार सधन शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याऐवजी ज्या शेतकऱ्यांना तातडीची मदतीची आवश्‍यकता आहे, त्यांना सरकारकडून आर्थिक साह्य केले जात असल्याची माहिती देण्यात आली.

एखादा शेतकरी सरकारी अटींमुळे बाधित होत असेल तर तो याचिका करू शकतो, असे स्पष्ट करून खंडपीठाने याचिका निकाली काढली. शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत आणखी एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी याचिकेत केली आहे. या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Amit Thackeray: मनसेचे अमित ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त पिकांची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडे करणार नुकसानभरपाईची मागणी!

आमदार यड्रावकरांचे ३१ लाखांचे बील थकीत तरी महावितरणचा कानाडोळा, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडलं; 'स्वाभिमानी'चा गंभीर आरोप

Gachiroli News: गडचिरोलीत वैशाखापूर्वीच वाढला उन्हाचा पारा; भर दुपारी रस्ते सुनसान; उन्हाच्या तिव्रतेमुळे आत्तापासूनच अनेकजण हैराण

SCROLL FOR NEXT