Mumbai Signal sakal media
मुंबई

BMC : मुंबईतील सर्व रस्त्यांवर होणार 'स्मार्ट सिग्नल' यंत्रणा

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईतील सर्व रस्त्यांवरील सिग्नल (Signals on Mumbai Roads) येत्या काळात स्मार्ट होणार आहे. वाहानांचा अंदाज घेऊन सिग्नलचा कालावधी ठरणार आहे. आतापर्यंत 258 सिग्नल स्मार्ट (Smart signal System) झालेले असून दुसऱ्या टप्प्यात 70 महत्वाच्या जंक्शनवरील सिग्नल स्मार्ट होणार आहेत. मध्य मुंबईतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईला जोडणारा पी.डी’मेलो मार्ग आणि कफ परेड परीसरातील 70 जंक्शन वरील सिग्नल स्मार्ट होणार आहेत. त्यासाठी महानगरपालिका (BMC) या जंक्शनचा भुगोल आणि वाहतुकीचा अभ्यास करुन कृती आराखडा (Action plan) तयार करणार आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे.

पुढील दोन ते अडीज वर्षात हे 70 जंक्शनवरील सिग्नल स्मार्ट होण्यास सुरवात होईल. असे पालिकेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मुंबईतील जंक्शनवर तब्बल 652 सिग्नल्स असून त्यातील आतापर्यंत 258 सिग्नल स्मार्ट पध्दतीने अद्यावत करण्यात आले. तर, आता 70 सिग्नल अद्यावत करण्यात येणार आहेत. उर्वरीत 324 सिग्नल टप्प्याटप्याने स्मार्ट करण्यात येणार आहेत.

Smart signal

काय आहे स्मार्ट सिग्नल ?

पारंपारीक सिग्नल पध्दतीत त्याचा कालावधी निश्‍चित केलेला असतो. म्हणजे लाल दिवा किती वेळ राहील, हिरवा दिवा किती वेळ राहील हे निश्‍चित असते. स्मार्ट सिग्नलींग पध्दतीने रस्त्यावरील वाहानांच्या संख्येनुसार सिग्नल स्वयंचलित पध्दतीने हा कालावधी ठरवतो. त्यात सिग्नलचा जास्तीत जास्त कालावधी निश्‍चित केलेला असतो. त्यानुसार सिग्नल स्वयंचलित पध्दतीने वेळ निश्‍चित करते.

मुंबईत फायदा काय ?

- मुंबईत वाहतुक प्रामुख्याने ...का दिवशेने होत असते.सकाळच्या वेळेस वाहतुक उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि संध्याकाळच्या वेळेला वाहतूक दक्षिणेकडून उत्तरेकडे होते.

-सिग्नलचा कालावधी ठरवलेला असल्याने ज्या बाजूला वाहनांची कोंडी आहे त्या बाजूची नाहक वेळ वाया जातो.

-जर स्मार्ट सिग्नल असतील तर वाहानांच्या संख्येनुसार सिग्नलचा कालावधी ठरु शकेल.

-त्यामुळे ज्या बाजुला वाहानांची सख्या जास्त आहे त्या बाजूला सिग्नल जास्त काळ सुरु राहून कोंडी सुटण्यास मदत होईल.

सल्लागार कशासाठी ?

महानगर पालिकेने सल्लागार नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. हा सल्लगार ठरलेल्या जंक्शनवरील वाहतुकीचा अभ्यास करेल. यात वर्दळच्या वेळी विना वर्दळीच्या वेळी कोणत्या बाजूला किती वाहाने असतात. याचा अभ्यास असेल तसेच पादचाऱ्यांचाही अभ्यास केला जाईल. त्याचबरोबर जंक्शनवरील वेग मर्यादा,अवजड वाहानांची संख्या बसेसची संख्या फेरीवाले यांचाही अभ्यास करुन अहवाल तयार करण्यात येईल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येईल. साधारण अडीज वर्षापर्यंत हा अभ्यास चालेल.

(छायाचित्रे - प्रशांत चव्हाण )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT