Water Tap Sakal
मुंबई

Mumbai News : एकीकडे कडक उन्हामुळे जिवाची काहिली; त्यात बसणार पाणीकपातीची झळ

पाण्याविना मुंबई कोरडी; मुंबईकरांना बसणार पाणीकपातीचा फटका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई, ता. २९ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे; तरीही मुंबईकरांना तब्बल महिनाभर १५ टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाण्यात कूपनलिकेच्या खोदकामामुळे गळती निर्माण झाल्याने मुंबईत पाण्याची समस्या भेडसावणार आहे.

दुरुस्तीचे काम शुक्रवार (ता. ३१) पासून हाती घेण्यात येणार असून ते अभियांत्रिकीच्या दृष्टीने मोठे आव्हान ठरणार आहे. सुमारे दीडशे फूट खोल उतरून जलवाहिनीची दुरुस्ती होणार आहे. एकीकडे कडक उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना पाणीकपातीच्या झळांनी मुंबईकर बेजार होणार आहे.

जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेचा अभियांत्रिकी विभाग करणार आहे. दुरुस्तीकाम अत्यंत किचकट असून त्यासाठी सुमारे दीडशे फूट जमिनीखाली उतरावे लागणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री आणि कामगार व तंत्रज्ञ लागणार आहेत. जशी यंत्रे लागतील तशी कामगारांची गरज भासणार आहे.

जलबोगदा बंद करून त्यातील पाणी काढून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर दुरुस्तीकाम सुरू केले जाईल. काम महिनाभर चालणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अभियंते (प्रकल्प) वसंत गायकवाड यांनी दिली. दुरुस्तीकामामुळे संपूर्ण मुंबईला पाणीकपात सहन करावी लागणार आहे. मुंबईच्या अनेक भागांत आधीच कमी दाबाने आणि

अपुरा पुरवठा होत असतो. त्यात आता पाणीकपात लागू होणार असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT