Mumbai  sakal
मुंबई

Mumbai : परिवहन विभागाच्या बढत्या, बदल्यांसाठी तारीख पे तारीख

रिक्त पदांमूळे एका अधिकाऱ्यांना सुमारे तिन कार्यालयांचे प्रभार.

प्रशांत कांबळे

Mumbai - राज्याचे रस्ता सुरक्षा विभाग, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन, बेकायदा वाहणांना रस्त्यांवर आळा घालण्याचे महत्वाचे काम राज्य परिवहन विभागाकडे आहे. मात्र, या विभागाचा पुरता बोजवारा उडाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच सध्या परिवहन मंत्री पद आहे. परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने अद्याप महत्वाचे पद असलेल्या आरटीओ आणि डेप्युटीआरटीओ पदाच्या बढत्या, बदल्यांची प्रक्रिया रखडली आहे. एका अधिकाऱ्याला दोन ते तिन कार्यालय सांभाळावी लागत आहे.

त्यामूळे वाहतुक व्यवस्थेवर परिणाम होतांना दिसून येत आहे. बुलढाणा येथील सिंधखेड राजा येथे खासगी ट्रव्हल्सच्या गंभीर अपघातामूळे राज्याच्या परिवहन विभागाच्या रिक्त पदांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

राज्यातील रस्ता सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी प्रामुख्याने परिवहन विभागाची आहे. दरवर्षी अभियानाची जोरदार सुरूवात केली जात असून, भव्यदिव्य कार्यक्रम सुद्धा आयोजीत केला जातो आहे.

मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांवर रस्ता सुरक्षा अभियान दिसून येत नाही. प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने, नुकतेच परिवहन आयुक्तांनी आता प्रत्येक आरटीओ कार्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा कक्ष स्थापन करण्याच्या सुद्धा सुचना दिल्यात मात्र, त्याची गंभीरता प्रशासनामध्ये नसल्याचे दिसते आहे. त्याचे कारण, राज्यातील जुन्या आकृतीबंधानुसार राज्यातील ५१ कार्यालयातील १५ कार्यालय आरटीओ पदाचे आहे.

तर ३६ कार्यालय डेप्युटीआरटीओ पदाचे आहे. त्यापैकी फक्त ५ आरटीओ अधिकाऱ्यांची नियमीत पद भरले असून, १० पद रिक्त आहे. तर डेप्युटीआरटीओचे फक्त २० पद भरले असून, सुमारे १६ पद रिक्त असल्याचे पुढे आले आहे.

त्यामूळे राज्यातील रस्त्यावर बेकायदा आणि वाहतुक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनांवर आळा घालण्यासाठी परिवहन विभाग अपयशी ठरत आहे. मे महिन्यात राज्य परिवहन विभागाने बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ३० जुन पर्यंत मुदतवाढ घेतली होती. मात्र, २ जुलै येऊनही त्यावर निर्णय अद्याप झाला नसल्याचे मंत्रालयातील परिवहन विभागातील अधिकारी नाव न लिहीण्याच्या अटिवर सांगत आहे.

अनफिट वाहनांची रस्त्यांवर धाव

राज्यातील विविध महामार्गांवर होणारे अपघात अनफिट वाहन आणि मानवी चुकांमूळे होत असल्याचे पुढे आले आहे. मात्र, यामध्ये मानवी चुकांपेक्षा जास्त अनफिट वाहनांमूळे अधिक अपघात होत असल्यांचे तज्ञ सांगत आहे. अशा वाहनांना आळा घालण्याचे काम महामार्ग पोलीस, आरटीओ आणि वाहतुक पोलीसांनी चोख बजावण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT