Mumbai News 
मुंबई

Mumbai News : चेंबूरमध्ये पावसाळ्यात रात्रीचे जागरण!

डोंगराच्या पायथ्याशी राहाणाऱ्या झोपडीधारकांच्या प्रश्नांकडे पालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची परिस्थिती.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai : चेंबूर येथील भारतनगर, विष्णूनगर परिसरातील बंजारा तांडा, साई टेकडी, गणेश टेकडी, समता नगर, भीम टेकडी व हशू अडवाणी नगरात अंदाजे अडीच हजारांहून अधिक घरे आहेत; तर विष्णू नगर परिसरात चारशेपेक्षा अधिक घरे आहेत. डोंगराच्या पायथ्याशी राहाणाऱ्या झोपडीधारकांच्या प्रश्नांकडे पालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची परिस्थिती आहे.

पाऊस सुरू झाला की एखादी दुर्घटना घडेल की काय, या भीतीखाली लहान मुलांसह रहिवाशांना रात्र जागून काढावी लागते. दोन वर्षांपूर्वी १८ जुलैला बंजारा तांडामधील घरावर दरड कोसळून २७ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

दरड कोसळल्यानंतर म्हाडाने अर्धवट संरक्षक भिंत उभारून ठेवली आहे. म्हाडाने बांधलेल्या अर्धवट व काही ठिकाणी डोंगराची उंची व संरक्षक भिंतीची उंची समान झालेली आहे. परिणामी दरड कोसळली तर घरे दबून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२०२१ मध्ये दरड कोसळल्यानंतर जिल्हाधिकारी व पालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले. संरक्षक भिंत स्ट्रक्चर ऑडिट प्लॅन तयार करण्यात आला आहे. प्रकिया सुरू आहे. शासनाने अंमलबजावणी केली पाहिजे.

- निधी शिंदे, माजी नगरसेविका (ठाकरे गट)

गेल्या दोन वर्षांपासून आमचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय. एखादी घटना घडली की तात्पुरते पुनर्वसन केले जाते. संरक्षक भिंतीचे काम अर्धवट करून ठेवले आहे. पाऊस आला की रात्र जागून काढावी लागते.

- सतीश साखरे, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्याच्या मंत्रिमंडळात जुने नेते कायम राहू शकत नाही, नवीन चेहरे...; उपमुख्यमंत्र्यांचं सुचक वक्तव्य, असं नेमकं का म्हणाले?

T20 World Cup : इंग्लंडच्या विजयाने India vs Pakistan सामन्याच्या आशा मावळल्या! उपांत्य फेरीत दोन्ही संघ समोरासमोर नाही येऊ शकणार

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

Rinku Singh: रिंकू सिंगची वर्ल्ड कप स्पर्धेच्या उर्वरित सामन्यातून माघार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

Investment Scheme: सुरक्षित गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय! पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिया योजना; दरमहा थोडी गुंतवणूक करा आणि मिळवा लाखांचा फंड

SCROLL FOR NEXT