Mumbai
Mumbai sakal
मुंबई

मुंबई : भारतातील प्रमुख ठिकाणच्या कार्यालयांचे भाडे वर्षभर स्थिर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतातील प्रमुख औद्योगिक व कार्यालयीन शहरांमधील ऑफिसचे भाडे वर्षभर साधारण स्थिर राहील, असा अंदाज मालमत्ता सल्लागार संस्थांनी वर्तविला आहे. गेला वर्षभर कोरोनाच्या फैलावामुळे अनेक कार्यालये बंद राहिली तर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम चा पर्याय दिला. आता कोरानाचा विळखा सैलावत असला तरीही कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु झाली नाहीत. तसेच अनेक कंपन्यांमध्येही संमिश्र मॉडेल वापरले जात आहे. त्यामुळे सध्याचीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

मुंबई, बंगळुरू तसेच एनसीआर (दिल्ली परिसर) येथे कार्यालयांचे प्रामुख्याने केंद्रीकरण झाले असून ही तीन शहरे म्हणजे देशातील कार्यालयांची प्रमुख बाजारपेठ आहे. तेथे यावर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील भाड्याचे दर तेच राहिले होते व पुढील वर्षातही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

बंगळुरूच्या कार्यालयांचे सरासरी भाडे एप्रिल ते जून या तिमाहीत घटले होते तर या तिमाहीतही ते तसेच आहे. दिल्ली एनसीआर तसेच मुंबईच्या बीकेसी परिसरातील दरही या तिमाहीत स्थिरच राहिले आहेत. मागील तिमाहीत मुंबईचे दर सुमारे दोन टक्के घटले होते. आशियाई देशांमध्ये येत्या वर्षात फक्त तैपेईमधील कार्यालयांचे दर वाढण्याची अपेक्षा आहे. नाईट फ्रँक या मालमत्ता सल्लागार संस्थेच्या एशिया पॅसिफिक प्राईम ऑफिस रेंटल इंडेक्स अहवालात वरील बाबी नमूद केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT