मुंबई

मुंबईकर उष्णतेने हैराण, दोन दशकातील सर्वाधिक उष्णतेची तिसऱ्यांदा नोंद

पूजा विचारे

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर उष्णतेने हैराण झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. ३६℃ इतकं तापमान मुंबईचं दिवसात नोंदवण्यात आलं आहे. 

आधीच कोरोनामुळे तोंडावर लावलेले मास्क आणि त्यामुळे बेजार झालेले मुंबईकर , आता त्यात भर म्हणून की काय उष्णतेत प्रचंड वाढ, त्यामुळे मुंबईकर पुरतेच हवालदिल झालेत. उष्णतेपासून थोडा थंडावा मिळावा म्हणून बाहेर गोळा किंवा शीत पेय खायची प्यायची इच्छा झाली तरी ती देखील सोय राहिली नाही. कारण कोरोनाची भीती आहे. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार झाल्यासारखी मुंबईकरांची स्थिती सध्या झाली आहे. मुंबईचा सध्याचा तापमान ३६℃ इतका गेल्या दोन दिवसात नोंदवण्यात आला आहे. आज सकाळी देखील मुंबईतील तापमान २० ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवलं गेलं आहे.

यंदाचं हे तापमान पाहता गेल्या २२ वर्षातील सर्वाधिक तापमानाच्या नोंदीची मुंबईतील ही तिसरी वेळ आहे. या आधी २८ फेब्रुवारी १९९९ मध्ये ३८.५ ℃ आणि १८ फेब्रुवारी २०१७ रोजी ३८.५℃ तापमानाची नोंद करण्यात आली होती. याचं कारण म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा प्रवाह अधिक तीव्र होतो. त्यामुळे हे उष्ण वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याला रोखतात म्हणून ही उष्णता वाढत असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

ही उष्णता हळूहळू कमी होईल पण नेमके आणखी किती दिवस उष्णता मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही करणार आहे ते सांगता येणार नाही. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याची गती मंदावली की तापमानात घट होईल. पण तूर्तास उष्णता वाढली आहे. मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

Mumbai temperature rise Record third highest temperature in two decades

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT