Tansa Lake  sakal
मुंबई

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांना दिलासा! 'इतकी' भरली शहराला पाणी पुरवणारी सात धरणं

रोहित कणसे

मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये अतापर्यंत ५०.१८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणातील पाणीपातळ वाढल्याने मुंबईतील नागरिकांना पाणीकपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दमम्यान धरणांमध्ये जमा झालेला पाणीसाठी हा गेल्या दोन वर्षीच्या तुलनेत अद्यापही कमीच आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. सध्या मुंबईची तहान भागवणाऱ्या या सातही धरणांमध्ये मिळून ७ लाख २६ दशलक्ष लीटरपेक्षा जास्त पाणीसाठी जमा झाला आहे. तर या सात धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लिटर (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) इतकी आहे.

२१ ऑक्टोबरला सर्व धरणे पुर्ण भरलेली असल्यास मुंबई शहराला वर्षभर पाणी व्यवस्थित पुरवलं जातं , सध्या फक्त तुळशी तलाव ओसंडून वाहतो आहे. तर तानसा आणि विहार ही धरणं ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. त्यामुळे धरणांच्या परिसरात पुढील दोन महिने चांगला पाऊस होणे गरजेचे आहे.

धरणांमध्ये पाणीसाठा किती?

  • अप्पर वैतरणा - २१.३८ टक्के

  • मोडक सागर - ७८.२६ टक्के

  • तानसा- ८९.२७ टक्के

  • मध्य वैतरणा - ५९.१६ टक्के

  • भातसा - ४२.०८ टक्के

  • विहार - ८३.२७ टक्के

  • तुळशी - १०० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT