Tansa Lake  sakal
मुंबई

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांना दिलासा! 'इतकी' भरली शहराला पाणी पुरवणारी सात धरणं

रोहित कणसे

मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये अतापर्यंत ५०.१८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणातील पाणीपातळ वाढल्याने मुंबईतील नागरिकांना पाणीकपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दमम्यान धरणांमध्ये जमा झालेला पाणीसाठी हा गेल्या दोन वर्षीच्या तुलनेत अद्यापही कमीच आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. सध्या मुंबईची तहान भागवणाऱ्या या सातही धरणांमध्ये मिळून ७ लाख २६ दशलक्ष लीटरपेक्षा जास्त पाणीसाठी जमा झाला आहे. तर या सात धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लिटर (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) इतकी आहे.

२१ ऑक्टोबरला सर्व धरणे पुर्ण भरलेली असल्यास मुंबई शहराला वर्षभर पाणी व्यवस्थित पुरवलं जातं , सध्या फक्त तुळशी तलाव ओसंडून वाहतो आहे. तर तानसा आणि विहार ही धरणं ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. त्यामुळे धरणांच्या परिसरात पुढील दोन महिने चांगला पाऊस होणे गरजेचे आहे.

धरणांमध्ये पाणीसाठा किती?

  • अप्पर वैतरणा - २१.३८ टक्के

  • मोडक सागर - ७८.२६ टक्के

  • तानसा- ८९.२७ टक्के

  • मध्य वैतरणा - ५९.१६ टक्के

  • भातसा - ४२.०८ टक्के

  • विहार - ८३.२७ टक्के

  • तुळशी - १०० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT