अजित पवार
अजित पवार sakal
मुंबई

Mumbai : माहितीनंतरच ओला दुष्काळाचा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई: अतिवृष्टीने राज्यात काही जिल्ह्यांत शेती आणि अन्य बाबींचे प्रचंड नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याचे संकेत राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिले; मात्र, सर्व माहिती हाती आल्यानंतरच त्याबाबतचा निर्णय होईल. तूर्तास तशी तयारी नसल्याचे उपुमख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे ओल्या दुष्काळाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्येच वादाला सुरवात होण्याची चिन्हे आहेत.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काही पक्षांकडून होत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. परंतु, प्रत्यक्ष नुकसानीची माहिती आल्याशिवाय ओला दुष्काळासंदर्भात निर्णय घेता येणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. कोकण, पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मराठावाडा, विदर्भात प्रचंड पाऊस झाल्याने सुमारे आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. या पार्श्वभूमीवर महिती घेऊन पुढील आठवड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करता येईल का, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काही पक्षांकडून होत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. परंतु, प्रत्यक्ष नुकसानीची माहिती आल्याशिवाय ओला दुष्काळासंदर्भात निर्णय घेता येणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. कोकण, पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मराठावाडा, विदर्भात प्रचंड पाऊस झाल्याने सुमारे आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. या पार्श्वभूमीवर महिती घेऊन पुढील आठवड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करता येईल का, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळतील का, याबाबत विमा कंपन्यांना आदेश दिला आहे. या काळात केंद्र सरकारने दुजाभाव करू नये. मदतीसाठी पैसे मागूनही केंद्र सरकार ते देत नाही. काही राज्यांना न मागता पैसे दिले जातात.’

एकूण नुकसान

सुमारे ८ हजार कोटी

मृतांच्या वारसांना मदत

प्रत्येकी ४ लाख रुपये

मृत व्यक्ती

७१ (महिनाभरात)

मृत जनावरे

९७

राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्व पातळ्यांवर मदत करीत आहे. शेती आणि नुकसान झालेल्या इतर घटकांचे पंचनामे करून मदत जाहीर केली जाईल. पुराच्या संकटात सापडलेल्यांना राज्य सरकारसोबत केंद्र सरकारनेही मदत वे पाहिजे. मात्र, तसे होत नाही. सर्व पूरग्रस्तांना योग्य आणि वेळेत मदत मिळेल.

- विजय वडेट्टीवार,

मदत व पुर्नवसन मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT