मुंबई

शिलवीने वैभवला बोलावलंच का ? नरेंद्रला मात्र हे अजिबात मान्य नव्हतं..

सकाळ वृत्तसेवा

कळवा : जावयाला आपल्या घरी बोलावले याचा राग मनात धरून, रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला मारहाण करत हत्या केल्याची घटना दिव्यात घडली. 

दिवा येथे राहणारे नरेंद्र नारायण चिल्कामारी (36) यांचे अनुष्का (40) हिच्याबरोबर दुसरे लग्न झाले होते. अनुष्काचं देखील पाहिलं लग्न झालं होतं. पहिल्या पतीपासून अनुष्काला शिलवी नावाची 22 वर्षांची मुलगी आहे. शिलवी हिने दिवा येथील वैभव जाधव याच्याबरोबर प्रेमविवाह केला होता. शिलवी बंगळूर येथील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. हे नरेंद्रला मान्य नव्हते. त्यातून जावई वैभव आणि नरेंद्र यांच्यात वाद सुरू होता. या वादातून काही दिवसांपूर्वी जावई वैभव याने नरेंद्र यांच्या घराची तोडफोड केली होती. 

महत्त्वाची बातमी :  मुंबईकरांसाठीची 'ती' गोड बातमी अखेर आली...

हा वाद मिटवण्यासाठी त्याने अनुष्काबरोबर तिच्या दिवा येथील घरी बैठक घेतली होती. मात्र वैभवने आपल्या घरी येणे नरेंद्रला मान्य नव्हते. वैभव घरी आल्याचे नरेंद्रला मोबाईलवरून समजले होते. याचा जाब मंगळवारी नरेंद्रने अनुष्काला विचारला होता. 

दरम्यान, अनुष्का आणि नरेंद्र या दोघांनाही दारूचे व्यसन होते. या दारूच्या नशेत दोघांचे वैभव घरी येण्यावरून भांडण झाले. या वादात नरेंद्रने अनुष्काला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून तिची हत्या केली, अशी माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक (गुन्हे) आर. बी. वळतकर यांनी दिली. या संदर्भात मुंब्रा पोलिसांनी अनुष्काचा पती आरोपी नरेंद्र चिल्कामारी (33) याला मंगळवारी रात्री अटक केली. या संदर्भात मुंब्रा पोलिस अधिक तपास करीत आहेत.  

WebTitle : narendra killed anushka for calling son in law in kalwa 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT