मुंबई

'शिवसेना आघाडी सरकार एकटी चालवत नसल्याची' राष्ट्रवादीच्या नेत्याने करून दिली आठवण

तुषार सोनवणे

मुंबई - शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. यावर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी स्पष्टीकरण दिले असले तरी, राज्यातील बड्या नेत्यांच्या या भेटीवर ्प्रतिक्रीया येणं सहाजिक आहे. या भेटीवर राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याने शिवसेना एकटी सरकार चालवत नसल्याची आठवण करून दिली आहे.

खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट दै. सामानाच्या मुलाखतीसाठी असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी, माध्यमं आणि राजकीय वर्तुळात याबाबत तर्कवितर्कांना उधान आलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला या भेटीमुळे काही फरक पडणार नाही, सरकारवर त्याचा परिणाम होणार नाही. हे सरकार शिवसेना एकटी चालवत नसून, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षही त्यांच्या सोबत असल्याची आठवण राष्ट्रवादीचे जेष्ट नेते माजीद मेमन यांनी शिवसेनेला करून दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीत समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत राहत असतात. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख जेवढे माध्यमांमध्ये चर्चेत नसतात तेवढे राऊत असतात असाही मार्मिक टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT