मुंबई

मुंबईत लवकरच नाईट क्लब बंद करणार?, पालकमंत्र्यांनी दिले संकेत

पूजा विचारे

मुंबई:  राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं काढलं आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशतः लॉकडाऊनचा सूचक इशारा दिला आहे. तसंच नाईट क्लब लवकर बंद होण्याची शक्यता मुंबईत आहे, असंही ते सांगायला विसरले नाहीत. 

 अनेक नाईट क्लब हे उशिरापर्यंत सुरु असतात. त्यावर सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुंबईत लवकरच नाईट क्लब बंद होण्याची शक्यता आहे. मुंबईत अशाच केसेस वाढल्या की लॉकडाऊनबाबतही निर्णय होऊ शकतो, अशी माहितीही अस्लम शेख यांनी दिली आहे.

चौपाटी, गेट वे ऑफ इंडियाला जातात अशा ठिकाणी गर्दी होताना दिसते. तसंच एमएमआर रिझनमधून लोक नोकरीलाही येत आहेत. गर्दी वाढत आहे. गर्दी वाढून रुग्ण संख्या वाढली की कारवाई करावी लागेल, असंही ते म्हणालेत. 

मुंबई हे शहर अत्यंत दाट लोकवस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते. लोकसंख्या जास्त असल्यामुळे येथे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. शहरातील रुग्णवाढ अशीच कायम राहिली तर येत्या काळात येथे कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवणं अशक्य असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच लसीकरण इतक्यात पूर्ण होणार नाही. WHO ने सांगितलं की आपल्यापद्धतीने कॅरी करा, असंही अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. 

Nightclub is likely close soon Mumbai Hint from Guardian Minister Aslam Sheikh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT