मुंबई- संजय निरुपम यांनी मुंबईतील उत्तर भारतीय आणि मराठी भाषिकांचा वाद लावण्याचे काम करू नये. अशा पद्धतीचा वाद निर्माण करून काँग्रेसला काही फायदा होणार नाही. उलट काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेला धक्का देण्याचे काम संजय निरुपम करत असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यांनी आज (ता.8) सांगितले.
रामदास आठवले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येत असलेल्या इंदूमिल येथे पाहणी करण्यासाठी आले होते. ते पुढे म्हणाले की, असे वाद निर्माण करून काँग्रेसला काही फायदा होणार नाही. संजय निरुपम यांनी मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये असा वाद निर्माण करू नये.
जेवढे योगदान मुंबईत उत्तर भाषिकांचे आहे. तेवढेच मराठी भाषिकांचेही आहे. मुंबईत उत्तरभारतीयांचे नाहीतर सगळ्या भारतीयांचे योगदान आहे. संजय निरुपम यांच्या मताशी मी सहमत नाही. मुंबईत मराठी आणि हिंदी भाषिक असा वाद मुंबईसाठी योग्य नाही. उत्तर भारतीयांमुळे मुंबई बंद पडेल या मताशीही मी सहमत नाही, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.