varsha gaikwad 
मुंबई

पहिली ते आठवी सरसकट पासच्या निर्णयावरून गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी त्यांना प्रमोट (वर्गोंन्नती)  करण्याचा निर्णय जाहीर करून पाच दिवस उलटून गेले. मात्र  अद्यापही शालेय शिक्षण विभागाने त्यासाठीचा जीआर अथवा साधे एक परिपत्रक जारी करण्यात न आल्याने राज्यभरात याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.  आपल्याकडे शिक्षण विभागाकडून कोणताही आदेश अथवा परिपत्रक मिळाले नसल्याचे सांगत राज्यातील अनेक शाळांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा सुरू ठेवल्या आहेत.यामध्ये  मुंबई, नवी मुंबई. आणि ठाणे जिल्ह्यातील सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी तर आपल्या परीक्षा उरकून पुढील  शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली आहे. तर काही शाळांमध्ये अद्यापही परीक्षा सुरू असल्याची माहिती पालकांकडून देण्यात आली.

शालेय शिक्षणमंत्र्यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच त्यासाठीचा आदेश हा दुसऱ्या दिवशी निघणे अपेक्षित होते, परंतु अजूनही शाळांना तशा सूचना अथवा लिखित आदेश पोचलेले नसल्याचे   मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.

पहिली ते आठवपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्गोंन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी  विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे  हे जाहीर करणार आहे, त्यासाठीच्या सूचना परिषदेला देण्यात आल्या आहेत.त्यामुळे लवकरच या सूचना जाहीर केल्या जातील.
- राजेंद्र पवार, उपसचिव, शालेय शिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच, पुढील काही दिवस अलर्ट जारी; हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

६० व्या वाढदिवसाला शाहरुख मन्नतबाहेर आलाच नाही; पोस्ट करत सांगितलं कारण, म्हणाला, 'माफी मागतो पण...

अर्ध शरीर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा मदतीसाठी टाहो, बाजूला २० मृतदेह पडलेले; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

MSRTC: दिवाळीत एसटीने रोज लाखभर प्रवाशांचा प्रवास; बारा दिवसांत १३.४८ लाख नागरिकांचे लालपरीला प्राधान्य

SCROLL FOR NEXT