मुंबई

'राज्यात परीक्षेदरम्यान एकही विद्यार्थी कोरोनाबाधित नाही'; मंत्री उदय सामंत

तुषार सोनवणे

मुंबई - राज्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा पार पडल्या असून त्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत राज्यात झालेल्या परीक्षांबाबतचा अहवाल राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना पाठवणार आहेत.

राज्यातील 13 विद्यापीठात काही अपवाद वगळता सगळ्या परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या.  यातील 2 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. पास होण्याची टक्केवारी 93 टक्के आहे.  ज्या विद्यार्थ्यांना कंन्टेंन्टमेंट झोन, पूर आणि अन्य कारणामुळे परीक्षा देता आली नसेल. त्यांची परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी मार्कशीट नियमित असणार आहे. त्यात कोव्हिडचा उल्लेख नाही. महाविद्यालये तसेच विद्यापीठांनी दाखवून दिले आहे की, कठीण काळातही ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा घेऊन चांगला निकाल लागला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोना काळात परीक्षा देणारा एकही विद्यार्थी बाधित किंवा संक्रमित झालेला नाही. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

काही विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेत असताना सायबर हल्ला झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या चौकशी साठी समिती नेमली आहे. तरीही ज्या कंपन्यांकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. त्या कंपन्या ब्लॅकलीस्ट करणार असल्याचीही माहिती सामंत यांनी दिली. येत्या 8 ते 10 दिवसात यंत्रणा का डॅमेज झाली हे चित्र स्पष्ट होईल. सायबर सेल त्याची योग्य ती चौकशी करीत आहे.

महाविद्यालये सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. दिल्ली, आणि केरळ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुले आपल्या राज्यात अद्यापतरी महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती सामंत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT