मुंबई

मुंबईत यंदा पाणीकपातीचे "नो टेन्शन'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, पाण्याचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. 

मध्य वैतरणा आणि भातसा ही धरणे पावसाळ्यात पूर्ण भरत नाहीत, असा अनुभव आहे. मात्र, यंदा ही धरणे भरत आली आहेत. मध्य वैतरणा धरणाची पूर्ण भरण्याची पातळी 285 मीटर आहे. हे धरण 284.18 मीटर भरले आहे. भातसा धरण पूर्ण भरण्याची पातळी 142.07 मीटर असून, ते 141.27 मीटर भरले आहे. तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे ही दोन धरणे लवकरच भरून वाहू लागतील. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या दोन्ही धरणांचे पाच ते आठ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. 

जून महिन्यापासून मुंबईत पावसाचा मुक्काम आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. आता पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सातही तलावांच्या क्षेत्रातही पाऊस कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पाणीकपातीचे संकट टळले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC News : महापालिकेत नगरसेविकांच्या पतींची अति लुडबूड; अधिकाऱ्यांना दमबाजी, मनमानी कारभार

'कूर्गी स्त्रिया सुंदर असतात आणि मी अशाच एकीशी लग्न केलंय': रश्मिकासाठी विजय देवरकोंडाचं गोड वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल, Viral Video

चक्क 9000mAh बॅटरीवाला OnePlus Nord 6 लाँच! परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स, सर्वकाही पाहा एका क्लिकवर

Mumbai: मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांची शिकार, दात आणि इतर अवयव काढून...; ६ आरोपींना अटक

Mcoca Crime : सोळा टोळ्यांतील ७९ गुंडांवर ‘मकोका’; पिंपरी चिंचवड पोलिसांची तीन महिन्यांतील कारवाई

SCROLL FOR NEXT