मुंबई

मुंबईत यंदा पाणीकपातीचे "नो टेन्शन'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, पाण्याचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. 

मध्य वैतरणा आणि भातसा ही धरणे पावसाळ्यात पूर्ण भरत नाहीत, असा अनुभव आहे. मात्र, यंदा ही धरणे भरत आली आहेत. मध्य वैतरणा धरणाची पूर्ण भरण्याची पातळी 285 मीटर आहे. हे धरण 284.18 मीटर भरले आहे. भातसा धरण पूर्ण भरण्याची पातळी 142.07 मीटर असून, ते 141.27 मीटर भरले आहे. तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे ही दोन धरणे लवकरच भरून वाहू लागतील. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या दोन्ही धरणांचे पाच ते आठ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. 

जून महिन्यापासून मुंबईत पावसाचा मुक्काम आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. आता पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सातही तलावांच्या क्षेत्रातही पाऊस कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पाणीकपातीचे संकट टळले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

पुण्यातील ऐतिहासिक पर्वती टेकडीचे सौंदर्य धोक्यात? TDR वाटपाचा वाद पुन्हा पेटला; चतुःशृंगी-शनिवारवाड्याला वेगळा न्याय का?

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर, ४०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद

iPhone 17 आजपासून भारतात उपलब्ध, खरेदीसाठी स्टोअरबाहेर झुंबड; मध्यरात्रीपासून रांगेत, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT