मुंबई

हिंदमातासाठी आता नवा प्रयोग; पाणी वाहून जाण्यासाठी बोगद्याचा विचार, वाचा सविस्तर

समीर सुर्वे



मुंबई : दरवर्षी मुसळधार पाऊस होताच पाण्यात जाणाऱ्या हिंदमाता परिसराचे हे संकट अजून पुढील काही वर्षे तरी कायम राहणार, असे दिसत आहे. येथील पर्जन्य वाहीन्याचे काम 90 टक्के पुर्ण झाल्यानंतर या वाहिन्यांमध्ये भुमिगत सुविधांचे अडथळे असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आता जमिनीच्या 25 मीटरखालून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बोगदा तयार करण्याचा विचार महापालिका करत आहे. 

हिंदमातापासून परळपर्यंत पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रे रोड येथे 100 कोटी रुपये खर्च करुन पंपिंग स्टेशन बांधण्यात आले. त्यानंतर तीन वर्षांपुर्वी येथील भुमिगत पर्जन्यवाहिन्यांची क्षमता वाढवण्यास सुरवात झाली. हे काम 90 टक्के झाले असून पुढील पावसाळ्यापर्यंत पुर्ण होणार होते. मात्र, 5 ऑगस्टरोजी झालेल्या पावसात या वाहिनीच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. 

नवी वाहीनी जमिनीखाली 6 मीटरवर असून 2.2 मिटर व्यासाची आहे. मात्र, यात जलवाहीन्या तसेच इतर वाहिन्यांमुळे या पर्जन्य वाहिनीची क्षमता 40 टक्क्यांनी कमी झाली आहे. ही वाहीनी 2.2 मिटर क्षमतेची असली तरी प्रत्यक्षात 1.7 मिटरच्या व्यासातूनच पाणी वाहून जात आहे. त्यामुळे पाण्याचा अपेक्षेप्रमाणे निचरा होत नाही.

पंपिंग स्टेशनही बांधावे लागणार
महापालिका पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आता जमिनीच्या 25 मीटर खालून बोगदा तयार करण्याच्या विचारात आहे. सुमारे 2.2 मिटर व्यासाचा हा जलबोगदा असेल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.  यासाठी 25 मीटरखालून पाण्याचा उपसा करण्यासाठी मिनी पंपिंग स्टेशनही बांधावे लागेल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT