मुंबई

'बेस्ट'च बेस्ट! लॉकडाऊन नंतर प्रवासी बसेसच्या संख्येत तब्बल 'इतकी' वाढ...

संजयघारपुरे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः लॉकडाऊन उठवण्यास सुरुवात झाल्यापासून बेस्टच्या फेऱ्यात एका महिन्यात एक हजाराने वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर प्रवासीही दहा लाखांनी वाढले आहेत. त्यामुळे बेस्टचे दिवसाचे उत्पन्न नव्वद लाखांवर गेले आहे. अनलॉक करण्याची प्रक्रिया 8 जूनपासून सुरु झाली. त्यादिवशी बेस्टच्या बावीसशे फेऱ्यांचा लाभ अडीच लाख प्रवाशांनी घेतला होता. कार्यालये आणि दुकाने खुली करण्यास सुरुवात केल्यामुळे हे घडले होते. आता एका महिन्यात बेस्च्या फेऱ्यांची संख्या बत्तीसशेपर्यंत गेली आहे. एकूण फेऱ्यांच्या ही 91 टक्के असल्याचे सांगण्यात आले. 

बेस्टचे प्रवासी प्रत्येक दिवशी वाढत आहेत. सध्या रोजच्या प्रवासांची संख्या दहा लाख आहे, या महिन्याअखेर ही प्रवासी संख्या रोजची सरासरी 15 लाख असेल असा कयास आहे. त्यामुळे रोजचे उत्पन्नही एक कोटीपेक्षा जास्त होऊ शकेल असा आधिकाऱ्यांचा अंदाज आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यासाठी बेस्टचा हातभार लागत आहे. ते मुंबईसह उपनगरात एकंदर पाचशे मार्गावर फेऱ्या सुरु चालवण्याचा विचार करीत आहेत. लॉकडाऊन कालावधीत वसई विरार, कल्याण, बदलापूर, पनवेल मार्गावरील स्पेशल सेवा तसेच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी असलेली सेवा बंद केल्यानंतरही प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.  

बेस्टने आता पास विक्रीही सुरु केली आहे. ही विक्री 29 ठिकाणी सुरु केली आहे. अर्थात सुरुवातीस ही सुविधा सध्या पासच्या नूतनीकरणासाठी आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन कालावधीतील पासची मुदत वाढवण्यासाठीच आहे. सध्या बेस्टमध्ये एकावेळी बसलेले 25 तर उभे पाच प्रवासी असतात.

-------------------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?

Narayangaon News : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

SCROLL FOR NEXT