कांदा पुन्हा रडवतोय! झाली 'इतकी' दरवाढ...
कांदा पुन्हा रडवतोय! झाली 'इतकी' दरवाढ... 
मुंबई

कांदा पुन्हा रडवतोय! झाली 'इतकी' दरवाढ...

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कांद्याची आवक कमी झाल्यामुळे सोमवारी (ता.20) कांद्याच्या दराने उसळी घेतली. अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले, तर कांदा रोपांना पावसाचा फटका बसल्याने लागवड उशिरा झाली. त्यातच मध्यंतरी परदेशातून सुरू करण्यात आलेली कांद्याची आयात बंद करण्यात आली. त्यामुळे बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असून, परिणामी दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, मार्च अखेरपर्यंत कांद्याचे दर हे असेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

अवकाळी पावसामुळे शेतात कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यामुळे सद्यस्थितीत माल उपलब्ध नाही. त्यातच देशी कांद्याच्या तुलनेत परदेशी कांद्याला उठाव नसल्याने आयात बंद करण्यात आली होती. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत असल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. इजिप्तवरून येणाऱ्या कांद्याचे घाऊक दर शनिवारी (ता.18) 28 रुपये किलो होते. ते सोमवारी 38 रुपयांवर येऊन पोहचले आहेत. मध्यंतरी घाऊक बाजारात 35 रुपये किलो दरात विक्री होणाऱ्या कांद्याचे दर पुन्हा 52 रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. परदेशी कांद्याचे सध्या दोन कंटेनर आवक बाजारात होत आहे. सोमवारी नाशिक, नगरवरून येणाऱ्या 106 गाड्यांची आवक बाजारात झाली असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. 

नवीन कांदा जोपर्यंत बाजारात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहतील. शेतात माल उपलब्ध नाही. त्यात परदेशी मालाला उठाव नाही. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. 
- सुरेश शिंदे, कांदा-बटाटा व्यापारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

High Temperature : कोलकातामध्ये पन्नास वर्षातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद; हवामान खात्याने दिली माहिती

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Rinku Singh T20 WC 24 : मिठाई, फटाके अन् सेलिब्रेशन, रिंकूचा फोन आला अन्... वडिलांनी सांगितलं त्या दिवशी काय घडलं

Jitendra Awhad : गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

SCROLL FOR NEXT