raj-uddhav  file photo
मुंबई

मुंबई मॉडेलच्या श्रेयावरुन मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकारचं श्रेय हे कसं काय?

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत मागच्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्या कमी होत आहे. कोरोना स्थिती (covid situation) नियंत्रणात येतेय. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 163 दिवसांवर आला आहे. लॉकडाउनच्या निर्णयामुळे कोरोनास्थिती नियंत्रणात आल्याचा सरकारचा दावा आहे. मुंबईत ऑक्सिजनपासून ते बेडपर्यंत ज्या पद्धतीने कोविडचं व्यवस्थापन झालं, त्या मॉडेलचं (mumbai model) सर्वत्र कौतुक होत आहे. (over mumbai model mns leader sandeep deshpande slam thackeray govt)

या मुंबई मॉडेलचं श्रेय घेण्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवीन सामना रंगण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुंबई मॉडेलच्या श्रेयाच्या मुद्यावरुन एक टि्वट केलं आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रश्न विचारताना ठाकरे सरकारवरही टीका केली आहे. "रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकार, अशी दुटप्पी भूमिका कशी घेता?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

मुंबईत काल 1794 नवीन रुग्ण सापडले, तर 3580 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर कमी होऊन 0.41 टक्क्यांवर खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ही कमी होऊन 163 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai covid situation) नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. मृतांचा आकडा कमी झाला नसून काल ७४ रुग्णांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT