Rajesh-Tope 
मुंबई

मग महाराष्ट्रातच काय अडचण आहे? पत्रकाराच्या प्रश्नावर राजेश टोपेंनी दिलं उत्तर

राजेश टोपे म्हणाले....

दीनानाथ परब

मुंबई: देशात येत्या एक मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाचा नवीन टप्पा सुरु होणार आहे. पण महाराष्ट्र सरकारने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण लांबवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात १ मे पासून १८ वर्षापुढील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस मिळणार नाही. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राजेश टोपेंना यावेळी एका पत्रकाराने देशाच्या अन्य भागात १ मे ला लसीकरण सुरु होणार आहे, मग महाराष्ट्रातच काय अडचण आहे? असा प्रश्न विचारला.

त्यावर राजेश टोपेंनी "१ मे पासून देशातील कुठलही राज्य १८ ते ४४ वयोगटासाठी पूर्णपणे लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करेल असं वाटत नाही. लसींचा पुरवठा करणाऱ्या फक्त दोन कंपन्या आहेत. केंद्र सरकारने आधीच त्यांच्याकडे आगाऊ लसींची ऑर्डर दिली आहे. या दोन कंपन्या महाराष्ट्रालाही लस पुरवठा करतील, पण तो पुरवठा नतंर होईल" असे उत्तर टोपेंनी दिले.

"१८ वर्षापुढील वयोगटासाठी लसीकरण सुरु करुन नंतर दोन-चार दिवसांनी ते बंद करणं योग्य नाही. त्यात सातत्य राहिलं पाहिजे. ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. १ मे रोजी लसीकरण सुरु करण्यात अडचण नाही. दोन-चार लाख लसीचे डोस मिळतील पण नंतर लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पुन्हा लसीकरण बंद करावे लागेल. ४५ वर्षापुढील वयोगटासाठी लसीकरणाच्या कार्यक्रमातून हे दिसून आलय" असं टोपे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

Kolhapur Muncipal : मनपा निवडणूक आचारसंहिता लागू होताच कारवाई; कोल्हापुरात इच्छुकांचे फलक हटवले

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

SCROLL FOR NEXT